शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

यंदाच्या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या कामासाठी १०० कोटींची तरतुद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील रस्त्यांची समस्या बिकट झाली असून, रस्त्यांच्या समस्येने त्रस्त असलेल्या जळगावकरांच्या मनात सत्ताधारी व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील रस्त्यांची समस्या बिकट झाली असून, रस्त्यांच्या समस्येने त्रस्त असलेल्या जळगावकरांच्या मनात सत्ताधारी व प्रशासनाविरोधात तीव्र संताप आहे. हाच संताप दुर करण्यासाठी मनपाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन रस्त्यांसाठी १०० कोटींची तरतुद करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी दिली आहे. तसेच मनपाकडून यंदाच्या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ देखील होणार नसल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले असून, पुढील आठवड्यात प्रशासनाकडून अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे.

अंदाजपत्रक सादर केल्यानंतर ३१ मार्चपूर्वी अंदाजपत्रकाला महासभेची परवानगी घेणे गरजेचे असते. त्यादृष्टीने प्रशासकीय स्तरावर अंदाजपत्रकाची तयारी पुर्ण झाली असून, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी अंदाजपत्रकाचा आढावा घेतला. मोठी आकडेवारी सादर न करता, करवसुली वाढवून मनपाची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी काही ठोस निर्णय यंदाच्या अंदाजपत्रकात घेतले जाण्याची शक्यता आहे. २२ रोजी मनपाचे अंदाजपत्रक सादर होण्याची शक्यता असून, त्यानंतर स्थायीच्या सदस्यांचा अभ्यास पुर्ण झाल्यानंतर स्थायी समितीचे सभापती काही त्रुटी दुर करून काही बदल सुचवणार आहेत. त्यानंतरच अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी दिली जाईल.

रस्त्यांचा कामांवर भर

शहरातील रस्त्यांबाबत मनपाकडून विशेष तरतुद केली जाणार आहे. आधी मनपा फंडातून एकूण ७० कोटींच्या नवीन रस्त्यांची तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये ३० कोटींची वाढ करून रस्त्यांची कामे केली जाणार असल्याची माहिती सभापतींनी दिली. यासह मालमत्ताकराच्या रक्कमेत वाढ करण्याबाबत देखील विशेष योजना आणण्याची तयारी असल्याची माहिती मनपाच्या सुत्रांनी दिली आहे. यासह स्वच्छ शहराच्या दृष्टीने व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या सुविधा पुरविण्याबाबत देखील महत्वाचे निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पात घेतले जाण्याची शक्यता आहे.