शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

युती सरकारने दिलेले १०० कोटी आघाडी सरकारने काढून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:30 IST

जळगाव : महापालिकेत भाजपची सत्ता आणली, पक्षाचा महापौर केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विकासासाठी शंभर-शंभर कोटी रूपये दिले. मात्र, ...

जळगाव : महापालिकेत भाजपची सत्ता आणली, पक्षाचा महापौर केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विकासासाठी शंभर-शंभर कोटी रूपये दिले. मात्र, दुर्दवाने आमचे सरकार गेल्यानंतर, पैशांचे नियोजन होण्याआधीच या सरकारने मंजुर केलेले सर्व पैसे काढुन घेतल्याची टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी अमृत योजने अंतर्गंत पाणी पुरवठा योजनेच्या उद्घटनाप्रसंगी सरकारवर केली.

यावेळी व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, चोपड्याचे आमदार लता सोनवणे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गटनेते भगत बालाणी, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, कैलास सोनवणे उपस्थित होते.

गिरीश महाजन यांनी शहरात अमृत व भुयारी गटारींच्या कामामुळे रस्त्यांची खुप दुरवस्था झाली आहे. जळगाव ऐवजी धुळीचे गाव अशी टीका होत आहे. मात्र, अमृतचे काम झाल्यानंतर मंजुर झालेल्या ७० कोटींच्या कामांमधून रस्त्यांचा प्रश्न लवकरात मार्गी लावणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

इन्फो :

सुरेश दादा म्हणजे विकासाचे व्हिजन

माजी मंत्री सुरेश दादा यांच्याकडे विकासाचे व्हिजन असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. त्यांच्या कार्यकाळात जळगावात १७ मजलीची इमारत झाली. ही इमारत पहायला राज्यातुन नव्हे तर देशातुन नागरिक पहायला येत असल्याचे महाजन यांनी सांगितले.

इन्फो :

गावांची निवड करतांना राजकारण केले नाही - पालकमंत्री

जिल्ह्यात ७०२ गावे अशी आहेत की, ज्यांना पाण्याचे पंपींग वाढविली पाहिजे, नवीन योजना केली पाहिजे किंवा दुरूस्ती केली पाहिजे अशी आहेत. त्यानुसार जिल्ह्याच्या कृती आराखड्यांत प्रत्येक तालुक्यातील पक्ष विरहित ७०२ गावांचा आराखडा तयार केला आहे. हे करीत असतांना तिथे कुठल्या पक्षाचा आमदार आहे, कुठल्या पक्षाचा जि.प.सदस्य आहे, याचा कुठलाही विचार ना राजकारण करता गावांची निवड केली असल्याचे पालक मंत्र्यांनी सांगितले. आमदार सुरेश भोळे यांनीही आपल्या मनोगतात ही योजना सुप्रिम कॉलनीत राबवितांना अनेक समस्यांनाचा सामना करावा लागला असल्याचे सांगितले. तर नगरसेवक कैलास सोनवणे यांनींही गेल्या ३० ते ४० वर्षांत येथील नागरिकांची पाण्याची समस्या मिटली असून, टप्प्याने शहरातील सर्व भागात अमृतचे पाणी लवकरच पोहचविणार असल्याचे सांगितले.

इन्फो :

परिसरात टाकली १५ किमी जलवाहिनी

अटल नवीकरण आणि शहरी परिवर्तन मिशन अमृत योजनेंतर्गत सुप्रीम कॉलनीसाठी १५ लक्ष लिटर्सची उंच पाण्याची टाकी १५ लक्ष लिटर्सची भूमीगत पाणी साठवण टाकी, पंप घर, ३५ एचपीचे २ पंप, १ लाख ४० हजार लीटर प्रतितास विसर्ग क्षमता, परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी ११० मिमीच्या १२८२९ मीटर, १४० मिमीच्या १७०० मीटर, १८० मिमीच्या ६१९ मीटर, २२५ मिमीच्या ३०० मीटर अशा एकूण १५ हजार ४४८ मीटर जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.