शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

100 गणरक्षक व पुण्याचे 600 ढोलवादक पथक

By admin | Updated: September 25, 2015 00:29 IST

जळगाव : गणेश विसजर्न मिरवणुकीसाठी पुण्याचे 600 ढोलवादक शहरात दाखल होतील तसेच बंदोबस्तासाठी पोलिसांसोबतच 100 गणरक्षक नेमण्यात आले आहे.

जळगाव : गणेश विसर्जन अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपले आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनासह सार्वजनिक गणेश महामंडळाने विसर्जनाची जोरदार तयारी सुरु केली आहे. मिरवणुकीला गालबोट लागू नये, शिस्तीत मिरवणूक निघावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या दिमतीला सार्वजनिक गणेश महामंडळातर्फे शंभर गणरक्षक नेमण्यात आले आहेत. त्यांना स्वतंत्र असा पोशाख असणार आहे तसेच यंदा मिरवणुकीत पुणे येथील 600 ढोलवादक सहभागी होणार असून मिरवणुकीत रंग भरणार आहे.

बसेस्च्या मार्गात बदल

चोपडा, यावल, विदगावकडून जळगावकडे येणा:या जाणा:या सर्व एस.टी.बसेस् शिवाजी नगर पुलावरुन न जाता महामार्गावरुन आकाशवाणी चौक, गुजराल पेट्रोल पंप चौक, जुनी जैन फॅक्टरी, दूध फेडरेशन, गेंदालाल मील, शिवाजीनगरमार्गे येतील व जातील. तसेच आसोदा, भादलीकडून येणा:या व जाणा:या बसेस मोहन टॉकीज, गजानन मालुसरे नगर, जुने जळगाव, लक्ष्मी नगर व कालिंका माता मंदिराजवळून मुख्य महामार्गाने अजिंठा चौक, आकाशवाणीमार्गे बसस्थानकाला जातील व येतील.

जीव रक्षक नेमणार

मेहरुण तलावावर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस व मनपा प्रशासनाने तलावाच्या काठी बंदोबस्तासह बॅरिकेट्स लावले जाणार आहेत. तलावातून मोठय़ा प्रमाणात गाळ व मुरुम काढण्यात आल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे धोका अधिक आहे. हा धोका लक्षात घेता सार्वजनिक गणेश महामंडळाच्यावतीने जीव रक्षक नेमण्यात येणार आहेत. पट्टीचे पोहणा:यांनी सचिन नारळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिरवणूक मार्गावर रुग्णवाहिका व प्रथमोपचाराची सुविधा

मिरवणूक मार्गावर एखादा गणेशभक्त अथवा बंदोबस्तावरील कर्मचा:याला काही दुखापत झाली तर तत्काळ उपचार मिळावे यासाठी मिरवणूक संपर्पयत दोन रुग्णवाहिका, डॉक्टर व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषद, शिवसेना व टेनिस असोसिएशनने यासाठी पुढाकार घेतला आहे.

अशी निघेल मिरवणूक

नेहरु पुतळ्यापासून सुरू झालेली मिरवणूक पारंपरिक पध्दतीने टॉवर चौक, घाणेकर चौक, बालाजी मंदिर, रथ चौक, सुभाष चौक, पांडे डेअरी चौक, इच्छादेवी, शिरसोली नाका मार्गे मेहरुण तलावाजवळ पोहचेल. तलावाजवळ सप्तशृंगी मातेच्या मंदिराजवळून सर्व मंडळाच्या मूतींचे विसर्जन होईल. मिरवणुकी ढोल, ताशा, पारंपरिक नृत्य आदिवासी पथक, आखाडे व चित्तथरारक खेळाने मिरवणूक लक्षवेधी व उत्कृष्ट असणार आहे.

''कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल कटीबध्द आहे. उपद्रवी लोकांना हद्दपार केले आहे. शांतता भंग करणा:यावर कडक कारवाई केली जाईल. गुन्हेमुक्त गणेशोत्सवासाठी प्रय} आहेत.''

-डॉ.जालिंदर सुपेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक.