शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

जलसंपदामंत्र्यांपर्यंत आपली लिंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST

आष्टी : जलसंपदामंत्री जयंतराव पाटील साहेबांपर्यंत लिंक आहे. बाधित क्षेत्रासाठी ३५ लाख रुपये मंजूर करून आणल्याच्या थापा मारत काही ...

आष्टी : जलसंपदामंत्री जयंतराव पाटील साहेबांपर्यंत लिंक आहे. बाधित क्षेत्रासाठी ३५ लाख रुपये मंजूर करून आणल्याच्या थापा मारत काही दलाल पैशांसाठी शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. हा प्रकार थांबवावा, अशी मागणी आष्टी (ता. परतूर) परिसरातील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या औरंगाबादेतील विभागीय कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

परतूर तालुक्यातील गोदावरी नदीवरील लोणी-गंगासावंगी बंधाऱ्याच्या पाण्यामुळे अनेकांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. त्याचा मोबदला मिळवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल करून काही व्यक्ती पैसे घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. शेतकऱ्यांना तुमचे बाधित क्षेत्र वाढवून देऊ, माझी जलसंपदामंत्री जयंतराव पाटील साहेबापर्यंत लिंक आहे. त्यांना पी.ए.मार्फत पैसे द्यावे लागतात. आम्ही त्यांच्याकडून बाधित क्षेत्रासाठी ३५ लाखांचा निधी पैसे देऊन मंजूर करून आणला आहे. अशा थापा मारीत कामासाठी १० टक्के कमिशन अगोदर द्यावे लागेल, असे सांगत हे दलाल शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करीत आहेत. पाटबंधारे विभागातील देशमुख, मस्के, सोळंके या अधिकाऱ्यांची नावे वापरून दलालांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. संबंधित विभागाने प्रसिद्धिपत्रक काढून शेतकऱ्यांची जनजागृती करावी, दलालांवर कारवाई करावी, अशी मागणी विक्रम तौर, उत्तम पवार, आनंद डवले आदींनी केली आहे.

कॅप्शन : औरंगाबादेत मुख्य अभियंता आव्हाड यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देताना शेतकरी विक्रम तौर, उत्तम पवार, आनंद डवले.