शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

जागतिक परिचारिका दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST

परिचारिकांचे महत्त्व आताच्या कोविड काळात आणखी प्रभावीपणे जाणवले. ज्यावेळी कोरोनाची लागण झाल्याची माहिती ही प्रियजनांना कळते, त्यावेळी रक्ताची नाती ...

परिचारिकांचे महत्त्व आताच्या कोविड काळात आणखी प्रभावीपणे जाणवले. ज्यावेळी कोरोनाची लागण झाल्याची माहिती ही प्रियजनांना कळते, त्यावेळी रक्ताची नाती इच्छा असूनही जवळ येऊ शकत नाही. अशावेळी डॉक्टरांचा राऊंड झाल्यावर त्या रुग्णांची सर्वस्वी काळजी या परिचारिका म्हणजेच नर्स घेतात. हे सर्व करत असताना त्या सीमेवरील जवानाप्रमाणे आपले प्राण तळहातावर घेऊनच कोरोना रुग्णांची सेवा करतात. कधी संसर्ग होईल हे सांगत येत नाही; परंतु संसर्ग होईल या भीतीने त्यांनी कधीच रुग्णांना वाऱ्यावर सोडले असे कधीच घडले नाही.

आज गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे सर्व जण घरबंद झाले आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे आकडे हे सर्वसामान्यांची झोप उडवत आहेत. अशाही स्थितीत परिचारिका या मोठ्या हिमतीने रुग्णसेवेला प्राधान्य देतात. वर्षभरापूर्वी जालन्यात पहिला कोरोना रूग्ण म्हणून एक महिला आढळली होती. त्यावेळी त्यांची घेतलेली काळजी ते आतापर्यंत कोविड रुग्णालयात सुरू असलेले कर्तव्यपालन हे सर्व जालनेकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. सरकारी रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयातही परिचारिकांचे कर्तव्य हे सॅल्यूट करणारेच आहे.

कोविडमध्ये या परिचारिका बजावताहेत कर्तव्य

कोविड हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षभरात कोरोना रुग्णांची काळजी घेण्यासाठी सर्वच परिचारिका आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यात प्रामुख्याने प्रमुख परिचारिका म्हणून ज्योती भूरमुडे, एस. एल. पंडित, कडू पाटील, शिल्पा सानप, अनुजा जाधवर, अनिता चव्हाण, मंगल खडे, मंगल राऊत, सुनीता मोरे, वासंती खनगे, अनुजा दाणी, अनिसा सिध्दीकी, शीतल सरदार, सीमा भालतिलक, तेजस्विनी बहुरे आदींचा समावेश आहे.