शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

६१९ शेतकऱ्यांच्या शेतात होणार विहिरींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 01:07 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय निवड सोमवारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय निवड सोमवारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. लॉटरी पध्दतीने घेण्यात आलेल्या या निवड प्रक्रियेत ६१९ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.ही निवड प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली. यावेळी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर, सभापती कळंबे, सभापती बनसोडे, कृषी अधिकारी भिमराव रणदिवे आदींची उपस्थिती होती.अध्यक्ष खोतकर व उपाध्यक्ष टोपे यांच्या हस्ते कॉईन काढून सोडतीला सुरूवात करण्यात आली. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजनेसाठी जिल्हाभरातील ४ हजार ६८७ शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी ४ हजार २५९ जणांचे प्रत्यक्ष अर्ज प्राप्त झाले. यातून २४४० अर्ज पात्र ठरविण्यात आले असून, १८१९ अर्ज अपात्र ठरविण्यात आले. पात्र अर्जांची सोमवारी लॉटरी पध्दतीने निवड करण्यात आली असून, यात ५८३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. अंबड तालुक्यातील १०२, बदनापूर ९९, भोकरदन ३६, घनसावंगी ३२, जाफराबाद २४, जालना १८९, परतूर ५३ व मंठा तालुक्यातील ४८ लाभार्थ्यांचा समावेश आहे.तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी २०२ शेतक-यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १०० अर्ज पात्र ठरविण्यात आले. १०२ अर्ज अपात्र ठरविण्यात आले होते. पात्र ठरलेल्या अर्जांपैकी ३६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यात अंबड तालुक्यातील ५, बदनापूर १, भोकरदन ९, घनसावंगी ३, जाफराबाद ९, जालना २, मंठा ४, परतूर तालुक्यातील ३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी शेतक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.अनिरुध्द खोतकर : कार्यालयात तक्रार बॉक्स तयार कराकृषी अधिका-यांनी तातडीने पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची बिल देयके द्यावीत. बिलासाठीच लाभार्थ्यांना चकरा- मारू देऊ नका. यासाठी कृषी अधिका-यांनी सर्व अधिका-यांची बैठक घेऊन त्यांनाही या सूचना द्याव्यात. शेतक-यांच्या तक्रारीसाठी कृषी कार्यालयात तक्रार बॉक्स ठेवावा. आलेल्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचना जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी उपस्थित अधिका-यांना यावेळी दिल्या आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदAgriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना