शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

६१९ शेतकऱ्यांच्या शेतात होणार विहिरींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 01:07 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय निवड सोमवारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय निवड सोमवारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. लॉटरी पध्दतीने घेण्यात आलेल्या या निवड प्रक्रियेत ६१९ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.ही निवड प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली. यावेळी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर, सभापती कळंबे, सभापती बनसोडे, कृषी अधिकारी भिमराव रणदिवे आदींची उपस्थिती होती.अध्यक्ष खोतकर व उपाध्यक्ष टोपे यांच्या हस्ते कॉईन काढून सोडतीला सुरूवात करण्यात आली. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजनेसाठी जिल्हाभरातील ४ हजार ६८७ शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी ४ हजार २५९ जणांचे प्रत्यक्ष अर्ज प्राप्त झाले. यातून २४४० अर्ज पात्र ठरविण्यात आले असून, १८१९ अर्ज अपात्र ठरविण्यात आले. पात्र अर्जांची सोमवारी लॉटरी पध्दतीने निवड करण्यात आली असून, यात ५८३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. अंबड तालुक्यातील १०२, बदनापूर ९९, भोकरदन ३६, घनसावंगी ३२, जाफराबाद २४, जालना १८९, परतूर ५३ व मंठा तालुक्यातील ४८ लाभार्थ्यांचा समावेश आहे.तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी २०२ शेतक-यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १०० अर्ज पात्र ठरविण्यात आले. १०२ अर्ज अपात्र ठरविण्यात आले होते. पात्र ठरलेल्या अर्जांपैकी ३६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यात अंबड तालुक्यातील ५, बदनापूर १, भोकरदन ९, घनसावंगी ३, जाफराबाद ९, जालना २, मंठा ४, परतूर तालुक्यातील ३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी शेतक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.अनिरुध्द खोतकर : कार्यालयात तक्रार बॉक्स तयार कराकृषी अधिका-यांनी तातडीने पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची बिल देयके द्यावीत. बिलासाठीच लाभार्थ्यांना चकरा- मारू देऊ नका. यासाठी कृषी अधिका-यांनी सर्व अधिका-यांची बैठक घेऊन त्यांनाही या सूचना द्याव्यात. शेतक-यांच्या तक्रारीसाठी कृषी कार्यालयात तक्रार बॉक्स ठेवावा. आलेल्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचना जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी उपस्थित अधिका-यांना यावेळी दिल्या आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदAgriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना