शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

६१९ शेतकऱ्यांच्या शेतात होणार विहिरींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 01:07 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय निवड सोमवारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय निवड सोमवारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. लॉटरी पध्दतीने घेण्यात आलेल्या या निवड प्रक्रियेत ६१९ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.ही निवड प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली. यावेळी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर, सभापती कळंबे, सभापती बनसोडे, कृषी अधिकारी भिमराव रणदिवे आदींची उपस्थिती होती.अध्यक्ष खोतकर व उपाध्यक्ष टोपे यांच्या हस्ते कॉईन काढून सोडतीला सुरूवात करण्यात आली. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजनेसाठी जिल्हाभरातील ४ हजार ६८७ शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी ४ हजार २५९ जणांचे प्रत्यक्ष अर्ज प्राप्त झाले. यातून २४४० अर्ज पात्र ठरविण्यात आले असून, १८१९ अर्ज अपात्र ठरविण्यात आले. पात्र अर्जांची सोमवारी लॉटरी पध्दतीने निवड करण्यात आली असून, यात ५८३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. अंबड तालुक्यातील १०२, बदनापूर ९९, भोकरदन ३६, घनसावंगी ३२, जाफराबाद २४, जालना १८९, परतूर ५३ व मंठा तालुक्यातील ४८ लाभार्थ्यांचा समावेश आहे.तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी २०२ शेतक-यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १०० अर्ज पात्र ठरविण्यात आले. १०२ अर्ज अपात्र ठरविण्यात आले होते. पात्र ठरलेल्या अर्जांपैकी ३६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यात अंबड तालुक्यातील ५, बदनापूर १, भोकरदन ९, घनसावंगी ३, जाफराबाद ९, जालना २, मंठा ४, परतूर तालुक्यातील ३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी शेतक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.अनिरुध्द खोतकर : कार्यालयात तक्रार बॉक्स तयार कराकृषी अधिका-यांनी तातडीने पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची बिल देयके द्यावीत. बिलासाठीच लाभार्थ्यांना चकरा- मारू देऊ नका. यासाठी कृषी अधिका-यांनी सर्व अधिका-यांची बैठक घेऊन त्यांनाही या सूचना द्याव्यात. शेतक-यांच्या तक्रारीसाठी कृषी कार्यालयात तक्रार बॉक्स ठेवावा. आलेल्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचना जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी उपस्थित अधिका-यांना यावेळी दिल्या आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदAgriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना