शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

लोकप्रतिनिधी महिला तरी कारभार पतींकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:35 IST

निवडणुकीत महिला निवडून आल्या तरी त्यांचे पतीच कारभार करतात व त्यांना काम करु देत नाहीत. महिला कर्तबगार नसल्याने त्यांचे पती कारभारात हस्तक्षेप करतात. अशा कारभारावर प्रसार- प्रचार माध्यमांनी टिकेची झोड उठविली पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा महिला आघाडीच्या जालना संपर्कप्रमुख डॉ. मनिषा कायंदे यांनी येथे केले.

ठळक मुद्देमनिषा कायंदे : जालन्यातील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित मेळाव्यात समाज व्यवस्थेवर कडाडून टीका

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : निवडणुकीत महिला निवडून आल्या तरी त्यांचे पतीच कारभार करतात व त्यांना काम करु देत नाहीत. महिला कर्तबगार नसल्याने त्यांचे पती कारभारात हस्तक्षेप करतात. अशा कारभारावर प्रसार- प्रचार माध्यमांनी टिकेची झोड उठविली पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा महिला आघाडीच्या जालना संपर्कप्रमुख डॉ. मनिषा कायंदे यांनी येथे केले.शिवसेनेच्या वतीने मा. फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, माजी आ. संतोष सांबरे, किसानसेनेचे भानुदास घुगे, सभापती पांडुरंग डोंगरे, जि.प. सभापती सुमन घुगे, महिला आघाडीप्रमुख सविता किवंडे, शिक्षक सेनेचे प्रा. लक्ष्मण गोल्डे, दलित आघाडीचे अ‍ॅड. भास्कर मगरे उपस्थित होते.डॉ. कायंदे म्हणाल्या की, खरे तर महिलांना कारभार करता आला पाहिजे. त्यांना पूर्ण संधी उपलब्ध करु न दिली पाहिजे. याकरिता शिवसेनेच्या वतीने महिला आघाडी सक्षम करु न त्यांना तशा प्रकारची शिकवण करु न देण्यात येणार असल्याचे सांगत जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिला आघाडीची शाखा स्थापन होऊन प्रत्येक घरात शिवसेना महिला कार्यकर्त्या तयार व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सविता किवंडे यांनी प्रास्ताविकात कामकाजाचा आढावा सादर केला. तसेच मातोश्री बचत गटांच्या माध्यमातून दीड हजार गटांची नोंदणी झाली असून, आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन जास्तीत-जास्त महिलांना सहभागी करु न घेतले जाईल, असे त्या म्हणाल्या. यावेळी लक्ष्मण वडले, अनिरुद्ध खोतकर यांचीही भाषणे झाली.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हरिहर शिंदे यांनी केले. यावेळी महिला आघाडीच्या दुर्गा देशमुख, राधा वाढेकर, विजया चौधरी, गंगुताई वानखेडे, मंजुषा घायाळ, संगीता नागरगोजे, चंदा शिंदे, सरपंच कालिंदा ढगे, गया पवार, बेबीताई पावसे, सारिका काटकर, मंगल मिटकर, शांता गुंजकर, रंजना सोनवणे, लिलावती मोरे, आशा कोळी, सुनिता कोलते, विजया शंकपाळ, वर्षा काळसकर, माधुरी पडूळ, रोहिणी तोगी, वैशाली जांगडे, अंजली मांडवकर, रंजना कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाJalanaजालना