शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ग्रामपंचायतच्या १२०२ अर्जातून २६८ जणांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:40 IST

मंठा : तालुक्यात होऊ घातलेल्या ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी २६८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे ...

मंठा : तालुक्यात होऊ घातलेल्या ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी २६८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. सध्या निवडणूक रिंगणात ९३४ उमेदवार राहिले आहेत. या पैकी २८ उमेदवार बिनविरोध निवडून गेल्याने आता मतदान प्रक्रियेत ९०६ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.

मंठा तालुक्यातील मतदान प्रक्रियेतून ५० ग्रामपंचायतींसाठी एकूण ४१८ सदस्य निवडले जाणार आहेत. ही मतदान प्रक्रिया १५६ प्रभागात होणार असल्याचे निवडणूक विभागाचे गणेश खराबे यांनी सांगितले. या निवडणुकीसाठी तालुक्यात चांगलेच राजकीय वातावरण तापलेले दिसून येत आहे. शिवाय सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. केंद्र सरकारच्या नव-नवीन योजनांमुळे प्रभावित झालेले नवतरुण या निवडणुकीत जास्त उत्साही दिसत आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये जनतेतून सरपंचाची निवड झाल्याने मंठा तालुक्यात दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली होती. तीन ग्रामपंचायतसाठी सदस्य बिनविरोध तर फक्त सरपंचांसाठी निवडणूक झाली होती; परंतु यंदा एकमेकांच्या तडजोडीतून फक्त २६८ उमेदवारी अर्ज परत घेण्यात आले आहेत, तर २८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मतदान रिंगणात असलेले ९०६ उमेदवार प्रचार कामाला लागले आहेत. तर मतदान प्रक्रियेची प्रशासकीय सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार घोबाळे व प्राधिकृत अधिकारी सुमन मोरे यांनी दिली.