शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडून लढाई जिंकणार : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून तत्कालीन सरकारने ज्यावेळी विधानसभेत ठराव मांडला होता, त्या ठरावाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता. ...

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून तत्कालीन सरकारने ज्यावेळी विधानसभेत ठराव मांडला होता, त्या ठरावाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता. नंतर या आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. तेथेही आपण जिंकलो. तेथे ज्या ज्येष्ठ विधिज्ञांनी बाजू मांडली होती. त्यांचीच नियुक्ती आपण सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्यांच्या मदतीला आणखी निष्णात वकिलांची फौज उभी केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शासन काहीच करत नाही. हा विरोधकांचा आरोप खोटा असल्याचे चव्हाण म्हणाले. एकूणच विरोधकांनी देखील काही चांगले मुद्दे सांगितल्यास त्याची दखलही आम्ही घेऊ अशी तयारी चव्हाण यांनी दर्शवली.

सर्वोच्च न्यायालयात अनेक राज्यांतील आरक्षण हे ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे, त्यांना स्थगिती दिली नाही. परंतु मराठा समाजाचा मुद्दा आल्यावरच स्थगिती का दिली हे समजू शकणारे नसल्याचेही चव्हाण म्हणाले यासाठी त्यांनी हरियाणा, तामिळनाडू या राज्यांचे उदाहरण दिले. मराठा समाजातील युवकांना अडचण ठरू नये म्हणून राज्य सरकारने विशेष बाब म्हणून त्यांना नियुक्ती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे ऊर्जा विभागासाठीचे जे निकष आहेत, ते सर्व विभागातील नोकर भरतीसाठी लागू करण्यात येणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

यावेळी त्यांनी निवेदनातील मुद्यांवरही चर्चा केली. ते म्हणाले की, लवकरच अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला अध्यक्ष देण्यात येणार असून, सारथी संस्थेसाठी देखील भरीव निधी देण्यात येणार आहे. कोरोनाच्या उद्रेकावर नियंत्रण राहावे म्हणून शिवजयंती साजरी करतांना गर्दी होऊ नये म्हणून बंधने घातल्याचा उल्लेख त्यांनी केला. साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांनी जे आंदोलन सुरू केले आहे, ते समाजाचा घटक म्हणून निश्चितच प्रेररणादायी आहे. आपण येथील नागरिक, महिला आणि युवतींचे यासाठी कौतुक करतो असे सांगून, आपल्या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन आता मागे घ्यावे अशी विनंती देखील त्यांनी केली. यावेळी साष्टपिंपळगाव येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी सभापती भीमराव डोंगरे, जयरंगे पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट

पक्षीय हितासाठी समाजाचा उपयोग होऊ देऊ नका

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गायकवाड समितीच्या शिफारशी आपण स्वीकारल्या आहेत. तसेच न्यायालयातही आपण भक्कमपणे बाजू मांडून ही आरक्षणाची लढाई आपण जिंकू असा विश्वास मला आहे. असे सांगतानाच विरोधी पक्ष आरक्षणाच्या मुद्याला धरून सरकार काहीच करत नाही असा कांगावा करत आहे, त्यात तथ्य नाही. केवळ आपल्या पक्षाला सहानुभूती मिळावी म्हणून जर हे सुरू असेल तर समाजबांधवांनी सतर्क राहून याचा विचार करणे गरजेचे असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.

---------------

फोटोओळी -

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याात गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या उपोषणात सहभागी झालेल्या युवतींशी चर्चा करताना बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व अन्य पदाधिकारी.