शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
11
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
12
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
13
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
14
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
15
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
16
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
17
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
18
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
19
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
20
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू

फुले मार्केटचे काम का रखडले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:21 IST

शहराच्या मध्यवर्ती भागात पालिकेच्या मालकीचे असलेले महात्मा फुले मार्केट पाडून तब्बल आठ वर्षे उलटून गेली आहेत.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराच्या मध्यवर्ती भागात पालिकेच्या मालकीचे असलेले महात्मा फुले मार्केट पाडून तब्बल आठ वर्षे उलटून गेली आहेत. पालिकेने याचे बांधकाम स्वत: करावे ही राज्य शासनाची भूमिका, तर बीओटी किंवा पीपीपी तत्त्वावर मार्केटची उभारणी करावी, अशी लोकप्रतिनिधींची भूमिका असल्याने याच्या कामाला अद्याप मुहूर्त मिळू शकलेला नाही. एकूणच लोकप्रतिनिधींची चालढकल आणि प्रशासनातील निर्ढावलेल्या अधिका-यांमुळे शहर दिवसेंदिवस बकाल होत आहे.या मार्केटमुळे पालिकेलाही चांगले उत्पन्न मिळत होते. इमारतीचे आयुष्यमान संपल्याचे सांगत याच्या पुनर्निर्माणाचा घाट घातला गेला. शहराच्या मध्यवर्ती भागात पालिकेच्या मालकीची ही जागा असल्याने याचा विकास पालिकेने स्वत: करावा, अशा नगर विकास खात्याच्या सचिवांच्या सूचना होत्या. त्यासाठी यूडीआयएसएसएम टी या योजनेंंतर्र्गत पालिकेला ८७ लाखांचा निधीही देण्यात आला. मात्र, तत्कालीन पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत, ही इमारत बीओटी अथवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) या तत्त्वावर बांधण्याची भूमिका घेतली. कुठलेही नियोजन न करता पूर्वीची इमारत पाडण्यात आली. त्यानंतर लोकप्रतिनिधी व अधिकारी संगीतखुर्चीप्रमाणे बदलत गेले आणि इमारतीचे काम रखडत गेले. परिणामी आठ वर्षांनंतरही या इमारतीच्या कामास प्रारंभ होऊ शकलेला नाही. तर दुसरीकडे हा परिसर बकाल झाला आहे.शहरातील महात्मा फुले मार्केटचे पुनर्निर्माण करण्यासाठी २००६ मध्ये हालचाली सुरु झाल्या. नकाशे आणि इमारती बांधकामाचे अंदाजपत्रक तयार आहे. पण चालढकलपणाच्या भूमिकेमुळे ही इमारत पूर्ण होऊ शकलेली नाही. एकीकडे शहरातील खाजगी व्यापारी संकुले झपाट्याने आकार घेत असताना, पालिकेच्या उदासीन भूमिकेमुळे फुले मार्केटचे भिजत घोंगडे कायम आहे. हेतूपुरस्सर या इमारतीचे काम अपूर्ण ठेवण्यात येत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.