शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील होम क्वारंटाईन १०६ जणांवर वॉच कोणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:26 IST

जालना : जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची रूग्णसंख्या घटली असली तरी कोरोनाची भीती आणखी कमी झालेली नाही. ...

जालना : जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची रूग्णसंख्या घटली असली तरी कोरोनाची भीती आणखी कमी झालेली नाही. असे असतानाही प्रशासनाकडून होम क्वारंटाईन असलेल्या १०६ व्यक्तींवर कुठल्याही प्रकारचा वॉच ठेवला जात नाही.

जालना जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या घटली आहे. असे असले तरी ब्रिटेनमध्ये कोरोनाने आपले रूप बदल्याने कोरोनाची भीती वाढली आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासन कुठल्याही उपाययोजना करताना दिसत नाही.

सध्या शहरातील बाजारपेठांसह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यातच कोणीही नियमांचे पालन करीत नसल्याचे चित्र पाहयला मिळत आहे.

होम क्वारंटाईन रूग्णांचे काय

अनेकजण कोविड सेंटरमध्ये भरती होण्यास टाळाटाळ करीत असल्याने शासनाने होम क्वारंटाईन राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बहुतांश रूग्णांनी होम क्वारंटाईन राहण्यास पसंती दिली आहे. होम क्वारंटाईन असलेल्या रूग्णाला नियमावली ठरवून दिले आहे. तसेच दररोज संबंधित रूग्णांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत. परंतु, मागील काही दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने घटली आहे. त्यामुळे प्रशासनानेही सुटकेचा श्वास घेतला आहे. परंतु, प्रशासनाकडून होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांवर कुठलाही वॉच ठेवल्या जात नाही. होम क्वारंटाईन असलेले रूग्ण घराबाहेर पडत असल्याने कोरोना पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

जालना जिल्हाभरात १०६ जण होम क्वारंटाईन आहे. होम क्वारंटाईन राहण्यासाठी संबंधितांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच आरोग्य कर्मचारी दररोज त्यांची पाहणी करत आहे. होम क्वारंटाईन असलेल्यांनी घराबाहेर पडू नये.

- अर्चना भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक