शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

पाण्याची किंमत कधी कळणार?

By admin | Updated: June 10, 2014 00:55 IST

जालना : दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाईतून होरपळून निघालेल्या जालनेकरांसह पालिका प्रशासनालाही पाण्याची अजूनही किंंमत कळली नाही, असे दुर्दैवी चित्र समारे आले आहे.

जालना : दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाईतून होरपळून निघालेल्या जालनेकरांसह पालिका प्रशासनालाही पाण्याची अजूनही किंंमत कळली नाही, असे दुर्दैवी चित्र समारे आले आहे. शहरातील विविध भागात पाणी सोडण्यात येते. परंतु ठिकठिकाणी जलवाहिन्या फुटल्यामुळे नेहमीच लाखो लिटर पाणी वाया जात आहे़ विशेषत: शहरातील देहेडकरवाडी, लक्कडकोट, कचेरी रोड, शास्त्री मोहल्ला यासह इतर भागात पाणीपुरवठा झाल्यानंतर फुटलेल्या जलवाहिन्यांतून पाण्याचे पाट वाहू लागतात. त्यामुळे परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे.दरम्यान, यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे परिसरातील जलसाठ्यात मुबलक पाणी आहे. त्यामुळे यावर्षी जालनेकरांना फारशी पाणीटंचाई भासली नाही. म्हणूनच की काय पाण्याचा बेसुमार अपव्यय होत आहे. नळांना पाणी आल्यानंतर तासन्तास उघड्या नळांमधून पाणी रस्त्यावर वाहत आहे. अनेक ठिकाणी चक्क वाहन, व्हरंडे, गच्ची धुतली जात आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळून निघालेल्या जालनेकरांना पाण्याचे आजही महत्व कळाले नाही, असेच म्हणावे लागेल. दुसरीकडे गळत्यांची दुरुस्ती करणे, तोट्या बसविण्याचे साधे आवाहनही पालिकेच्या वतीने करण्यात आले नाही. जायकवाडीहून जालन्यापर्यंत पाणी आणण्यासाठी तब्बल ८४ किलोमीटरचे अंतर कापावे लागते आहे़ त्यासाठी दोन ठिकाणी ३०० अश्वशक्तीचे प्रत्येकी सहा पंप बसविण्यात आले आहेत़ त्यासाठी विजेचा खर्च तब्बल ३२ लाख रूपये महिन्याकाठी खर्ची करावे लागतात़ शिवाय जलशुद्धीकरणासह देखभाल दुरूस्तीचा खर्च १५ लाखाच्या वर आहे़ शिवाय मनुष्यबळावरील खर्च वेगळा. एवढा खर्च होऊनही शहरातील अनेक भागांमधून पाण्याची गळती सुरूच आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाण्याचा अतिशय कमी वापर आणि नियोजन करण्याची गरज असतांना बेफिकीर जालनेकर अन् निष्काळजी प्रशासनामुळे ने मोठ्या प्रमाणात उदासिनता दाखविली जात आहे. त्यासाठी नगरसेवक, विभागप्रमुख आणि पालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष यांनी नियोजन करून गळती काढण्याचे काम हाती घेतल्यास वाया जाणारे वाचविता येईल़ विविध ठिकाणी खाजगी किंवा सार्वजनिक नळ उघडेच आहेत. नागरिकांसह सामाजिक संघटनांनीही पाणी वाचविण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबवावेत. नगरसेवकांनीही आप-आपल्या वॉर्डातील उघडे नळ बंद करावेत, नागरिकांनाही तसे आवाहन केल्यास पाण्याचा अपव्यय निश्चित कमी होईल, अशी अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)गळती कधी थांबविणार...संपूर्ण शहरात विविध भागात पाणीपुरवठा होत असताना सडलेल्या जलवाहिन्या व नादुरुस्त व्हॉल्व्हमुळे पाण्याचे पाट वाहतात. परंतु त्यांचे सोयरसुतक पालिकेच्या बहुतांश सदस्यांसह प्रशासनास नाही, असे दुर्दैवी चित्र समोर आले आहे़ सततच्या पाणीगळतीमुळे त्या-त्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. पाणीपुरवठ्यानंतर या खड्ड्यांमधून पाणी साचते. खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेकदा अपघातही होत आहेत. पालिकेने किमान हे खड्डे बुजवावेत अशी मागणी होत आहे. नागरिकही बेफि कीरसंपूर्ण उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या, विकतच्या पाण्यावरच तहान भागविणाऱ्या नागरिकांना अद्यापही पाण्याचे महत्व कळले नाही़ नळांना तोट्या बसविल्या नाहीत़ पाणी भरल्यानंतर पाणी वाया जाते आहे़नगरसेवकांचीही जबाबदारीउन्हाळ्यात स्वत:च्या खर्चातून आपल्या प्रभागात अनेक नगरसेवकांनी पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागविली. तसेच प्रभागातील नागरिकांना पाणी मिळण्यासाठी वेळप्रसंगी भांडणाऱ्या नगरसेवकांनीही स्वत:च्या प्रभागातील पाणी गळती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत.