शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची किंमत कधी कळणार?

By admin | Updated: June 10, 2014 00:55 IST

जालना : दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाईतून होरपळून निघालेल्या जालनेकरांसह पालिका प्रशासनालाही पाण्याची अजूनही किंंमत कळली नाही, असे दुर्दैवी चित्र समारे आले आहे.

जालना : दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाईतून होरपळून निघालेल्या जालनेकरांसह पालिका प्रशासनालाही पाण्याची अजूनही किंंमत कळली नाही, असे दुर्दैवी चित्र समारे आले आहे. शहरातील विविध भागात पाणी सोडण्यात येते. परंतु ठिकठिकाणी जलवाहिन्या फुटल्यामुळे नेहमीच लाखो लिटर पाणी वाया जात आहे़ विशेषत: शहरातील देहेडकरवाडी, लक्कडकोट, कचेरी रोड, शास्त्री मोहल्ला यासह इतर भागात पाणीपुरवठा झाल्यानंतर फुटलेल्या जलवाहिन्यांतून पाण्याचे पाट वाहू लागतात. त्यामुळे परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे.दरम्यान, यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे परिसरातील जलसाठ्यात मुबलक पाणी आहे. त्यामुळे यावर्षी जालनेकरांना फारशी पाणीटंचाई भासली नाही. म्हणूनच की काय पाण्याचा बेसुमार अपव्यय होत आहे. नळांना पाणी आल्यानंतर तासन्तास उघड्या नळांमधून पाणी रस्त्यावर वाहत आहे. अनेक ठिकाणी चक्क वाहन, व्हरंडे, गच्ची धुतली जात आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळून निघालेल्या जालनेकरांना पाण्याचे आजही महत्व कळाले नाही, असेच म्हणावे लागेल. दुसरीकडे गळत्यांची दुरुस्ती करणे, तोट्या बसविण्याचे साधे आवाहनही पालिकेच्या वतीने करण्यात आले नाही. जायकवाडीहून जालन्यापर्यंत पाणी आणण्यासाठी तब्बल ८४ किलोमीटरचे अंतर कापावे लागते आहे़ त्यासाठी दोन ठिकाणी ३०० अश्वशक्तीचे प्रत्येकी सहा पंप बसविण्यात आले आहेत़ त्यासाठी विजेचा खर्च तब्बल ३२ लाख रूपये महिन्याकाठी खर्ची करावे लागतात़ शिवाय जलशुद्धीकरणासह देखभाल दुरूस्तीचा खर्च १५ लाखाच्या वर आहे़ शिवाय मनुष्यबळावरील खर्च वेगळा. एवढा खर्च होऊनही शहरातील अनेक भागांमधून पाण्याची गळती सुरूच आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाण्याचा अतिशय कमी वापर आणि नियोजन करण्याची गरज असतांना बेफिकीर जालनेकर अन् निष्काळजी प्रशासनामुळे ने मोठ्या प्रमाणात उदासिनता दाखविली जात आहे. त्यासाठी नगरसेवक, विभागप्रमुख आणि पालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष यांनी नियोजन करून गळती काढण्याचे काम हाती घेतल्यास वाया जाणारे वाचविता येईल़ विविध ठिकाणी खाजगी किंवा सार्वजनिक नळ उघडेच आहेत. नागरिकांसह सामाजिक संघटनांनीही पाणी वाचविण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबवावेत. नगरसेवकांनीही आप-आपल्या वॉर्डातील उघडे नळ बंद करावेत, नागरिकांनाही तसे आवाहन केल्यास पाण्याचा अपव्यय निश्चित कमी होईल, अशी अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)गळती कधी थांबविणार...संपूर्ण शहरात विविध भागात पाणीपुरवठा होत असताना सडलेल्या जलवाहिन्या व नादुरुस्त व्हॉल्व्हमुळे पाण्याचे पाट वाहतात. परंतु त्यांचे सोयरसुतक पालिकेच्या बहुतांश सदस्यांसह प्रशासनास नाही, असे दुर्दैवी चित्र समोर आले आहे़ सततच्या पाणीगळतीमुळे त्या-त्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. पाणीपुरवठ्यानंतर या खड्ड्यांमधून पाणी साचते. खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेकदा अपघातही होत आहेत. पालिकेने किमान हे खड्डे बुजवावेत अशी मागणी होत आहे. नागरिकही बेफि कीरसंपूर्ण उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या, विकतच्या पाण्यावरच तहान भागविणाऱ्या नागरिकांना अद्यापही पाण्याचे महत्व कळले नाही़ नळांना तोट्या बसविल्या नाहीत़ पाणी भरल्यानंतर पाणी वाया जाते आहे़नगरसेवकांचीही जबाबदारीउन्हाळ्यात स्वत:च्या खर्चातून आपल्या प्रभागात अनेक नगरसेवकांनी पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागविली. तसेच प्रभागातील नागरिकांना पाणी मिळण्यासाठी वेळप्रसंगी भांडणाऱ्या नगरसेवकांनीही स्वत:च्या प्रभागातील पाणी गळती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत.