शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

बोंडअळीग्रस्तांच्या निधी वाटपास मुहूर्त सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:56 IST

जिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने २६३ कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. यातील ७३ कोटी ४३ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. मात्र, महसूल प्रशासनाकडून दोन आठवड्यांपासून याद्या तयार करण्याचा घोळ सुरू असल्याने बाधित शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने २६३ कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. यातील ७३ कोटी ४३ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. मात्र, महसूल प्रशासनाकडून दोन आठवड्यांपासून याद्या तयार करण्याचा घोळ सुरू असल्याने बाधित शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.जिल्ह्यात मागील वर्षी पाच लाख २८ हजार ८७३ शेतक-यांच्या तीन लाख ७२ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाचे गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान झाले होते. त्यामुळे कापूस उत्पादनावर परिणाम झाल्याने शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले होते.बोंडअळी बाधित कपाशी क्षेत्राचे पंचनामे केल्यानंतर शासनाने शेतक-यांना बियाणे उत्पादक कंपन्या, विमा व शासनस्तरावरून नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जालना जिल्ह्यासाठी २६३ कोटी रुपये मदत निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी प्रशासनास ७३ कोटी ४३ लाख रुपये प्राप्त झाले आहे. मदत रक्कम शेतक-यांचा बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. बाधित शेतक-यांना तात्काळ मदत वाटपाचे आदेश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत.मात्र, मदत देण्यापूर्वी ज्या शेतक-यांची नावे गावातील ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावून आक्षेप हरकती मागविण्यात येणार आहेत. तसेच महसूल प्रशासनाकडून शेतक-यांच्या नावासमोर बँक खाते क्रमांक अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. गाव पातळीवरील महसूल यंत्रणेच्या कर्मचाºयांकडून या कामात वेळकाढूपणा सुरू आहे.त्यामुळे जिल्ह्याला दोन आठवड्यांपासून अनुदान प्राप्त होवून त्याचे वाटप रखडले आहे. खरिपाच्या बी-बियाणे खरेदीला या अनुदानाचा उपयोग होईल, अशी आशा शेतक-यांना आहे.अनुदान उशिरा मिळाल्यास शेतक-यांना ऐन वेळी उसनवारी करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनुदान वाटपासाठी गतीने प्रयत्न करण्याची गरज आहे.खरीप हंगाम : जिल्ह्यात यंदा कपाशीचे क्षेत्र घटणारमागील वर्षी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे नुकसान झाल्याने यंदा कपाशीच्या क्षेत्र तब्बल ७८ हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. या तुलनेत सोयाबीन पेरणीकडे शेतक-यांचा कल आहे. परिणामी सोयाबीनच्या पेºयामध्ये वाढ होणार आहे. शेतक-यांनी खात्रीशीर बियाणे घेवून आवश्यक प्रक्रियेअंती कपाशीची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना