शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीग्रस्तांच्या निधी वाटपास मुहूर्त सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:56 IST

जिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने २६३ कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. यातील ७३ कोटी ४३ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. मात्र, महसूल प्रशासनाकडून दोन आठवड्यांपासून याद्या तयार करण्याचा घोळ सुरू असल्याने बाधित शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने २६३ कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. यातील ७३ कोटी ४३ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. मात्र, महसूल प्रशासनाकडून दोन आठवड्यांपासून याद्या तयार करण्याचा घोळ सुरू असल्याने बाधित शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.जिल्ह्यात मागील वर्षी पाच लाख २८ हजार ८७३ शेतक-यांच्या तीन लाख ७२ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाचे गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान झाले होते. त्यामुळे कापूस उत्पादनावर परिणाम झाल्याने शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले होते.बोंडअळी बाधित कपाशी क्षेत्राचे पंचनामे केल्यानंतर शासनाने शेतक-यांना बियाणे उत्पादक कंपन्या, विमा व शासनस्तरावरून नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जालना जिल्ह्यासाठी २६३ कोटी रुपये मदत निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी प्रशासनास ७३ कोटी ४३ लाख रुपये प्राप्त झाले आहे. मदत रक्कम शेतक-यांचा बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. बाधित शेतक-यांना तात्काळ मदत वाटपाचे आदेश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत.मात्र, मदत देण्यापूर्वी ज्या शेतक-यांची नावे गावातील ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावून आक्षेप हरकती मागविण्यात येणार आहेत. तसेच महसूल प्रशासनाकडून शेतक-यांच्या नावासमोर बँक खाते क्रमांक अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. गाव पातळीवरील महसूल यंत्रणेच्या कर्मचाºयांकडून या कामात वेळकाढूपणा सुरू आहे.त्यामुळे जिल्ह्याला दोन आठवड्यांपासून अनुदान प्राप्त होवून त्याचे वाटप रखडले आहे. खरिपाच्या बी-बियाणे खरेदीला या अनुदानाचा उपयोग होईल, अशी आशा शेतक-यांना आहे.अनुदान उशिरा मिळाल्यास शेतक-यांना ऐन वेळी उसनवारी करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनुदान वाटपासाठी गतीने प्रयत्न करण्याची गरज आहे.खरीप हंगाम : जिल्ह्यात यंदा कपाशीचे क्षेत्र घटणारमागील वर्षी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे नुकसान झाल्याने यंदा कपाशीच्या क्षेत्र तब्बल ७८ हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. या तुलनेत सोयाबीन पेरणीकडे शेतक-यांचा कल आहे. परिणामी सोयाबीनच्या पेºयामध्ये वाढ होणार आहे. शेतक-यांनी खात्रीशीर बियाणे घेवून आवश्यक प्रक्रियेअंती कपाशीची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना