शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

बोंडअळीग्रस्तांच्या निधी वाटपास मुहूर्त सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:56 IST

जिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने २६३ कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. यातील ७३ कोटी ४३ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. मात्र, महसूल प्रशासनाकडून दोन आठवड्यांपासून याद्या तयार करण्याचा घोळ सुरू असल्याने बाधित शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने २६३ कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. यातील ७३ कोटी ४३ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. मात्र, महसूल प्रशासनाकडून दोन आठवड्यांपासून याद्या तयार करण्याचा घोळ सुरू असल्याने बाधित शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.जिल्ह्यात मागील वर्षी पाच लाख २८ हजार ८७३ शेतक-यांच्या तीन लाख ७२ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाचे गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान झाले होते. त्यामुळे कापूस उत्पादनावर परिणाम झाल्याने शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले होते.बोंडअळी बाधित कपाशी क्षेत्राचे पंचनामे केल्यानंतर शासनाने शेतक-यांना बियाणे उत्पादक कंपन्या, विमा व शासनस्तरावरून नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जालना जिल्ह्यासाठी २६३ कोटी रुपये मदत निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी प्रशासनास ७३ कोटी ४३ लाख रुपये प्राप्त झाले आहे. मदत रक्कम शेतक-यांचा बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. बाधित शेतक-यांना तात्काळ मदत वाटपाचे आदेश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत.मात्र, मदत देण्यापूर्वी ज्या शेतक-यांची नावे गावातील ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावून आक्षेप हरकती मागविण्यात येणार आहेत. तसेच महसूल प्रशासनाकडून शेतक-यांच्या नावासमोर बँक खाते क्रमांक अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. गाव पातळीवरील महसूल यंत्रणेच्या कर्मचाºयांकडून या कामात वेळकाढूपणा सुरू आहे.त्यामुळे जिल्ह्याला दोन आठवड्यांपासून अनुदान प्राप्त होवून त्याचे वाटप रखडले आहे. खरिपाच्या बी-बियाणे खरेदीला या अनुदानाचा उपयोग होईल, अशी आशा शेतक-यांना आहे.अनुदान उशिरा मिळाल्यास शेतक-यांना ऐन वेळी उसनवारी करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनुदान वाटपासाठी गतीने प्रयत्न करण्याची गरज आहे.खरीप हंगाम : जिल्ह्यात यंदा कपाशीचे क्षेत्र घटणारमागील वर्षी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे नुकसान झाल्याने यंदा कपाशीच्या क्षेत्र तब्बल ७८ हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. या तुलनेत सोयाबीन पेरणीकडे शेतक-यांचा कल आहे. परिणामी सोयाबीनच्या पेºयामध्ये वाढ होणार आहे. शेतक-यांनी खात्रीशीर बियाणे घेवून आवश्यक प्रक्रियेअंती कपाशीची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना