शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

बोंडअळीग्रस्तांच्या निधी वाटपास मुहूर्त सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:56 IST

जिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने २६३ कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. यातील ७३ कोटी ४३ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. मात्र, महसूल प्रशासनाकडून दोन आठवड्यांपासून याद्या तयार करण्याचा घोळ सुरू असल्याने बाधित शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने २६३ कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. यातील ७३ कोटी ४३ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. मात्र, महसूल प्रशासनाकडून दोन आठवड्यांपासून याद्या तयार करण्याचा घोळ सुरू असल्याने बाधित शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.जिल्ह्यात मागील वर्षी पाच लाख २८ हजार ८७३ शेतक-यांच्या तीन लाख ७२ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाचे गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान झाले होते. त्यामुळे कापूस उत्पादनावर परिणाम झाल्याने शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले होते.बोंडअळी बाधित कपाशी क्षेत्राचे पंचनामे केल्यानंतर शासनाने शेतक-यांना बियाणे उत्पादक कंपन्या, विमा व शासनस्तरावरून नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जालना जिल्ह्यासाठी २६३ कोटी रुपये मदत निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी प्रशासनास ७३ कोटी ४३ लाख रुपये प्राप्त झाले आहे. मदत रक्कम शेतक-यांचा बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. बाधित शेतक-यांना तात्काळ मदत वाटपाचे आदेश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत.मात्र, मदत देण्यापूर्वी ज्या शेतक-यांची नावे गावातील ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावून आक्षेप हरकती मागविण्यात येणार आहेत. तसेच महसूल प्रशासनाकडून शेतक-यांच्या नावासमोर बँक खाते क्रमांक अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. गाव पातळीवरील महसूल यंत्रणेच्या कर्मचाºयांकडून या कामात वेळकाढूपणा सुरू आहे.त्यामुळे जिल्ह्याला दोन आठवड्यांपासून अनुदान प्राप्त होवून त्याचे वाटप रखडले आहे. खरिपाच्या बी-बियाणे खरेदीला या अनुदानाचा उपयोग होईल, अशी आशा शेतक-यांना आहे.अनुदान उशिरा मिळाल्यास शेतक-यांना ऐन वेळी उसनवारी करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनुदान वाटपासाठी गतीने प्रयत्न करण्याची गरज आहे.खरीप हंगाम : जिल्ह्यात यंदा कपाशीचे क्षेत्र घटणारमागील वर्षी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे नुकसान झाल्याने यंदा कपाशीच्या क्षेत्र तब्बल ७८ हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. या तुलनेत सोयाबीन पेरणीकडे शेतक-यांचा कल आहे. परिणामी सोयाबीनच्या पेºयामध्ये वाढ होणार आहे. शेतक-यांनी खात्रीशीर बियाणे घेवून आवश्यक प्रक्रियेअंती कपाशीची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना