शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

परतूर तालुक्यात गहू, हरभऱ्याचे पीक बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:29 IST

परतूर : तालुक्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू व हरभऱ्याची पेरणी केली आहे. सध्या ...

परतूर : तालुक्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू व हरभऱ्याची पेरणी केली आहे. सध्या गहू व हरभऱ्याचे पीक चांगलेच बहरले आहे. त्यातच कडाक्याची थंडी पडत असल्याने पिकास पोषक वातावरण मिळत आहे. त्यामुळे बळीराजा समाधान व्यक्त करीत आहे.

परतूर तालुक्यात यंदा जूनच्या सुरूवातीपासून जोरदार पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे खरिपाची पिके जोमात आली होती. परंतु, ऐन पिके काढणीला आली अन् तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामुळे खरिपातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला होता. असे असले तरी रब्बी हंगामासाठी मुबलक पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांनी जोमाने रब्बी हंगामात गहू, हरभर, बाजरी या पिकांची पेरणी केली. सध्या गहू व हरभऱ्याचे पीक जोमात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गहू व हरभऱ्यातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. मागील आठवड्यापासून तालुक्यात थंडी वाढली आहे . याचा फायदा हरभरा व गव्हाच्या पिकांना होत आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत असून, खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बीतील पिकांतून निघेल अशी अशा शेतकरी व्यक्त करीत आहे.

चौकट

कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद

दोन वेचणीतच कापासाचे पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीची फरदड न घेता कपाशी उपटून गहू व हरभऱ्याची पेरणी केली. त्यामुळे यंदा तालुक्यात गहू व हरभऱ्याच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.