शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

परतूर तालुक्यात गहू, हरभऱ्याचे पीक बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:29 IST

परतूर : तालुक्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू व हरभऱ्याची पेरणी केली आहे. सध्या ...

परतूर : तालुक्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू व हरभऱ्याची पेरणी केली आहे. सध्या गहू व हरभऱ्याचे पीक चांगलेच बहरले आहे. त्यातच कडाक्याची थंडी पडत असल्याने पिकास पोषक वातावरण मिळत आहे. त्यामुळे बळीराजा समाधान व्यक्त करीत आहे.

परतूर तालुक्यात यंदा जूनच्या सुरूवातीपासून जोरदार पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे खरिपाची पिके जोमात आली होती. परंतु, ऐन पिके काढणीला आली अन् तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामुळे खरिपातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला होता. असे असले तरी रब्बी हंगामासाठी मुबलक पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांनी जोमाने रब्बी हंगामात गहू, हरभर, बाजरी या पिकांची पेरणी केली. सध्या गहू व हरभऱ्याचे पीक जोमात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गहू व हरभऱ्यातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. मागील आठवड्यापासून तालुक्यात थंडी वाढली आहे . याचा फायदा हरभरा व गव्हाच्या पिकांना होत आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत असून, खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बीतील पिकांतून निघेल अशी अशा शेतकरी व्यक्त करीत आहे.

चौकट

कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद

दोन वेचणीतच कापासाचे पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीची फरदड न घेता कपाशी उपटून गहू व हरभऱ्याची पेरणी केली. त्यामुळे यंदा तालुक्यात गहू व हरभऱ्याच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.