शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

पोलिसांनी तातडीने तक्रार न घेतल्यास कारवाई करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST

जालना : मागील काही दिवसांपासून दुचाकीचोरी झाल्याच्या तक्रारी पोलीस कर्मचारी लवकर घेत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुचाकीच नाही ...

जालना : मागील काही दिवसांपासून दुचाकीचोरी झाल्याच्या तक्रारी पोलीस कर्मचारी लवकर घेत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुचाकीच नाही तर इतर कोणीतीही तक्रार लवकर न घेतल्यास संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिली. ते सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

जालना शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकीसह इतर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच पोलीस दुचाकीचोरीच्या तक्रार घेण्यास उशीर करतात. त्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागतो. याबाबत पोलीस अधीक्षकांकडेही तक्रारीदेखील झाल्या आहेत. याबाबत सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक विनायक देशमुख म्हणाले की, दुचाकीची तक्रार न घेतल्याच्या काही तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यावर लवकरच निर्णय घेऊ. जे पोलीस अधिकारी व कर्मचारी दुचाकीसह इतर तक्रारी लवकर घेणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही एटीएम चोरट्यांच्या मागावर असून, त्यांना लवकरच जेरबंद करू. सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जमाव बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. जमाव बंदी आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यांांवर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पो.नि. सुभाष भुजंग यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.