शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

आदेश धाब्यावर अन् पाणीपाकिटे रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:41 IST

पाणीपाकिटे व प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर करणा-यांवर ५० हजारांचा दंड आकारून थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा नोटिसा पालिकेने पाणीपाकिटे उत्पादक कंपन्यांना बजावल्या. मात्र, शहरात सर्वत्र पाणीपाकिटांचा खच पाहावयास मिळत आहे.

जालना : पाणीपाकिटे व प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर करणा-यांवर ५० हजारांचा दंड आकारून थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा नोटिसा पालिकेने पाणीपाकिटे उत्पादक कंपन्यांना बजावल्या. मात्र, शहरात सर्वत्र पाणीपाकिटांचा खच पाहावयास मिळत आहे. पर्यावरणास हानिकारक प्लॅस्टिक कॅरीबॅगचा सर्रास वापर सुरू असताना अद्याप कुणावरही कारवाई झालेली नााही. पाणीपाऊच उत्पादकांनी पालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखवली आहे.शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत पालिकेकडून स्वच्छता तसेच स्वच्छतेविषयक जनजागृतीसाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा, ओल्या कच-यापासून खत निर्मिती, ओला व सुका कचरा वेगळा करणे याबाबत नागरिकांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदतही घेतली जात आहे. मागील आठवड्यात मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी शहरात पाणीपाऊच विक्री करणा-या कंपनीच्या संचालकांची बैठक घेऊन पाणीपाकिटांची विल्हेवाट लावण्याबाबत नोटिसा दिल्या. तसे न केल्यास पन्नास हजारांचा दंड आकारून थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा त्यात होता. मात्र, पाणीपाऊच विक्रेत्यांनी पालिकेच्या नोटिसीला जुमानले नसल्याचे दिसत आहे. शहरात हॉटेल्स, फेरीवाले, चहा टपºयांवर आजही पाणीपाऊच वापरून रस्त्यावर टाकले जात आहेत. हीच पाणीपाकिटे नाल्यांमध्ये अडक त असल्याने नाल्या तुंबल्या आहेत. जुना जालना भागातील उड्डाणपुलाजवळील नाल्यात पाणीपाकिटांचा खच पाहावयास मिळत आहे. अंतर्गत भागातील नाल्याही पाणीपाकिटांमुळे तुंबल्या आहेत. शहरात नियमबाह्य प्लॅस्टिक कॅरीबॅगचीही सर्रास विक्री व वापर सुरू आहे. नगरपालिका प्रशासनाने अद्याप एकाही उत्पादकासह विक्रेत्यावर थेट दंडात्मक कारवाई केलेली नाही किंंवा पोलिसात तक्रारही दिलेली नाही. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण केवळ कागदोपत्री राबवले जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, याबाबत आढावा घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपाऊच विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असे नगरपालिकेचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख माधव जामदडे यांनी सांगितले.-------------कर वसुलीकडेही दुर्लक्षनगरपालिकेचे पदाधिकारी व अधिका-यांनी आपले लक्ष स्वच्छता मोहिमेच्या जनजागृतीवर केंद्रित केले आहे. बहुतांश कर्मचारीवर्ग याच कामासाठी जुंपण्यात आला आहे. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीकडे दुर्लक्ष झाले आहे. दोन महिन्यांत १६ कोटीं रुपये मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट गाठणे अशक्य असल्याची चर्चा वसुली विभागातील कर्मचारी करीत आहेत.----------------