शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

आदेश धाब्यावर अन् पाणीपाकिटे रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:41 IST

पाणीपाकिटे व प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर करणा-यांवर ५० हजारांचा दंड आकारून थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा नोटिसा पालिकेने पाणीपाकिटे उत्पादक कंपन्यांना बजावल्या. मात्र, शहरात सर्वत्र पाणीपाकिटांचा खच पाहावयास मिळत आहे.

जालना : पाणीपाकिटे व प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर करणा-यांवर ५० हजारांचा दंड आकारून थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा नोटिसा पालिकेने पाणीपाकिटे उत्पादक कंपन्यांना बजावल्या. मात्र, शहरात सर्वत्र पाणीपाकिटांचा खच पाहावयास मिळत आहे. पर्यावरणास हानिकारक प्लॅस्टिक कॅरीबॅगचा सर्रास वापर सुरू असताना अद्याप कुणावरही कारवाई झालेली नााही. पाणीपाऊच उत्पादकांनी पालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखवली आहे.शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत पालिकेकडून स्वच्छता तसेच स्वच्छतेविषयक जनजागृतीसाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा, ओल्या कच-यापासून खत निर्मिती, ओला व सुका कचरा वेगळा करणे याबाबत नागरिकांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदतही घेतली जात आहे. मागील आठवड्यात मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी शहरात पाणीपाऊच विक्री करणा-या कंपनीच्या संचालकांची बैठक घेऊन पाणीपाकिटांची विल्हेवाट लावण्याबाबत नोटिसा दिल्या. तसे न केल्यास पन्नास हजारांचा दंड आकारून थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा त्यात होता. मात्र, पाणीपाऊच विक्रेत्यांनी पालिकेच्या नोटिसीला जुमानले नसल्याचे दिसत आहे. शहरात हॉटेल्स, फेरीवाले, चहा टपºयांवर आजही पाणीपाऊच वापरून रस्त्यावर टाकले जात आहेत. हीच पाणीपाकिटे नाल्यांमध्ये अडक त असल्याने नाल्या तुंबल्या आहेत. जुना जालना भागातील उड्डाणपुलाजवळील नाल्यात पाणीपाकिटांचा खच पाहावयास मिळत आहे. अंतर्गत भागातील नाल्याही पाणीपाकिटांमुळे तुंबल्या आहेत. शहरात नियमबाह्य प्लॅस्टिक कॅरीबॅगचीही सर्रास विक्री व वापर सुरू आहे. नगरपालिका प्रशासनाने अद्याप एकाही उत्पादकासह विक्रेत्यावर थेट दंडात्मक कारवाई केलेली नाही किंंवा पोलिसात तक्रारही दिलेली नाही. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण केवळ कागदोपत्री राबवले जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, याबाबत आढावा घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपाऊच विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असे नगरपालिकेचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख माधव जामदडे यांनी सांगितले.-------------कर वसुलीकडेही दुर्लक्षनगरपालिकेचे पदाधिकारी व अधिका-यांनी आपले लक्ष स्वच्छता मोहिमेच्या जनजागृतीवर केंद्रित केले आहे. बहुतांश कर्मचारीवर्ग याच कामासाठी जुंपण्यात आला आहे. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीकडे दुर्लक्ष झाले आहे. दोन महिन्यांत १६ कोटीं रुपये मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट गाठणे अशक्य असल्याची चर्चा वसुली विभागातील कर्मचारी करीत आहेत.----------------