शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

आदेश धाब्यावर अन् पाणीपाकिटे रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:41 IST

पाणीपाकिटे व प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर करणा-यांवर ५० हजारांचा दंड आकारून थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा नोटिसा पालिकेने पाणीपाकिटे उत्पादक कंपन्यांना बजावल्या. मात्र, शहरात सर्वत्र पाणीपाकिटांचा खच पाहावयास मिळत आहे.

जालना : पाणीपाकिटे व प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर करणा-यांवर ५० हजारांचा दंड आकारून थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा नोटिसा पालिकेने पाणीपाकिटे उत्पादक कंपन्यांना बजावल्या. मात्र, शहरात सर्वत्र पाणीपाकिटांचा खच पाहावयास मिळत आहे. पर्यावरणास हानिकारक प्लॅस्टिक कॅरीबॅगचा सर्रास वापर सुरू असताना अद्याप कुणावरही कारवाई झालेली नााही. पाणीपाऊच उत्पादकांनी पालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखवली आहे.शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत पालिकेकडून स्वच्छता तसेच स्वच्छतेविषयक जनजागृतीसाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा, ओल्या कच-यापासून खत निर्मिती, ओला व सुका कचरा वेगळा करणे याबाबत नागरिकांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदतही घेतली जात आहे. मागील आठवड्यात मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी शहरात पाणीपाऊच विक्री करणा-या कंपनीच्या संचालकांची बैठक घेऊन पाणीपाकिटांची विल्हेवाट लावण्याबाबत नोटिसा दिल्या. तसे न केल्यास पन्नास हजारांचा दंड आकारून थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा त्यात होता. मात्र, पाणीपाऊच विक्रेत्यांनी पालिकेच्या नोटिसीला जुमानले नसल्याचे दिसत आहे. शहरात हॉटेल्स, फेरीवाले, चहा टपºयांवर आजही पाणीपाऊच वापरून रस्त्यावर टाकले जात आहेत. हीच पाणीपाकिटे नाल्यांमध्ये अडक त असल्याने नाल्या तुंबल्या आहेत. जुना जालना भागातील उड्डाणपुलाजवळील नाल्यात पाणीपाकिटांचा खच पाहावयास मिळत आहे. अंतर्गत भागातील नाल्याही पाणीपाकिटांमुळे तुंबल्या आहेत. शहरात नियमबाह्य प्लॅस्टिक कॅरीबॅगचीही सर्रास विक्री व वापर सुरू आहे. नगरपालिका प्रशासनाने अद्याप एकाही उत्पादकासह विक्रेत्यावर थेट दंडात्मक कारवाई केलेली नाही किंंवा पोलिसात तक्रारही दिलेली नाही. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण केवळ कागदोपत्री राबवले जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, याबाबत आढावा घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपाऊच विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असे नगरपालिकेचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख माधव जामदडे यांनी सांगितले.-------------कर वसुलीकडेही दुर्लक्षनगरपालिकेचे पदाधिकारी व अधिका-यांनी आपले लक्ष स्वच्छता मोहिमेच्या जनजागृतीवर केंद्रित केले आहे. बहुतांश कर्मचारीवर्ग याच कामासाठी जुंपण्यात आला आहे. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीकडे दुर्लक्ष झाले आहे. दोन महिन्यांत १६ कोटीं रुपये मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट गाठणे अशक्य असल्याची चर्चा वसुली विभागातील कर्मचारी करीत आहेत.----------------