शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाणीचोर बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:02 IST

शहरातील २० हजारांपेक्षा अधिक असलेल्या अवैध नळ जोडण्यांचा शोध घेण्यासाठी पालिकेने स्थापन केलेले पथकही कागदावरच आहे.

जालना : जायकवाडी-जालना योजनेतून शहराला मुबलक पाणी उपलब्ध होत असतानाही केवळ वितरण व्यवस्थेतील अडचणींमुळे शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. शहरातील २० हजारांपेक्षा अधिक असलेल्या अवैध नळ जोडण्यांचा शोध घेण्यासाठी पालिकेने स्थापन केलेले पथकही कागदावरच आहे.नगर पालिकेच्या नोंदीनुसार शहरात ४४ हजार मालमत्ता असून, सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणानुसार त्यात सुमारे २० हजार मालमत्तांची भर पडण्याची शक्यता आहे. असे असले तरी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात केवळ २२ हजार अधिकृत नळ जोडण्यांची नोंद आहे. अधिकृत जोडणी असणारे अनेक नागरिक नियमित पाणीपट्टी भरीत नाहीत. पाणीपट्टीची वसुली जेमतेमच आहे. त्यामुळे शहरात अवैध नळ जोडण्यांच्या माध्यमातून होणारी पाणी चोरी थांबविणे गरजेचे आहे. विविध भागात असलेल्या अवैध नळ जोडण्यांचा शोध घेऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणे, तसेच थेट गुन्हे दाखल करण्यासाठी पालिकेने नवीन जालना व जुना जालना भागासाठी २६ कर्मचा-यांचे पथक तयार केले आहे. या मोहिमेसाठी पथक प्रमुख म्हणून सुरेश गंगासागरे यांची तर कारवाईस सहायक म्हणून पाणीपुरवठा अभियंता अशोक दासवाड व संजय वाघमारे यांची नेमणूक करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांतील नळ जोडण्यांचा आठ ते पाच या वेळेत शोध घेण्याच्या सूचना पथकातील कर्मचा-यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, अवैध नळजोडणी शोध पथकाने अद्यापही प्रत्यक्षात कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे पालिकेची पाणीपट्टीही बुडत असून, मुख्य जलवाहिनीवर अवैध जोडण्या घेऊन पाणीचोरीचे प्रकार सुरूच आहेत. पाणीपट्टीची वसुली अत्यंत कमी असल्यामुळे पालिकेला पाणीपुरवठा योजनेचा वाढता खर्च भागविताना मोठी कसरत करावी लागत आहे.-----------नवीन जालना व जुना जालना भागातील अवैध नळ जोडण्यांचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. पथकात २६ कर्मचा-यांचा समावेश आहे. मुख्याधिका-यांचे कारवाईचे आदेश मिळताच अवैध नळ शोध मोहिमेला कारवाईला सुरुवात केली जाईल.सुरेश गंगासागरे, अवैध नळ शोध मोहीम प्रमुख.