शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

जलसंधारण : पाझरतलावांच्या आठ कोटी रुपयांच्या बिल वाटपात संशयाचा धूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST

दरम्यान, पाच ते सात वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पाझर तलावांची देखभाल आणि दुरूस्तीची कामे करण्यात आली होती. त्यासाठी निधीच मिळत नव्हता. ...

दरम्यान, पाच ते सात वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पाझर तलावांची देखभाल आणि दुरूस्तीची कामे करण्यात आली होती. त्यासाठी निधीच मिळत नव्हता. कसा बसा तीन महिन्यांपूर्वी २० कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. त्यातून आठ ते दहा कोटी रुपयांची जुनी देयके अदा केली गेली आहेत. ही देयके अदा करतांना त्यात तांत्रिक निकष न पाहता केली असल्याचे बोलले जाते.

चौकट

देयकांचे वाटप हे निकषानुसारच

जलसंधारण विभागाने पूर्वी केलेल्या कामांची देयके वाटप करतांना कुठलेच निकष डावलले नाहीत. ही बिले देताना आमचे वरिष्ठ तसेच मुख्य अभियंत्यांचा अभिप्राय घेऊन आणि सर्व त्या कागदपत्रांची पूर्तता करूनच ती वाटप केली आहेत. या बिल वाटपाच्या मुद्द्यावरून जे गैरसमज काहीजणांकडून पसरविले जात आहेत, त्यात तथ्य नाही.

कविराज कुचे, जिल्हा जलसंधारण अधिकारी, जालना

चौकट

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज

कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असतांना जुन्या कामांना विशेष बाब म्हणून हा कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्याचे वाटप सर्व तांत्रिक निकष पाळून केलेल्या कामांवर झाल्यास त्यात गैर नाही. परंतु तांत्रिक निकष डावलून जर ही बिले वाटली असतील तर ही गंभीर बाब होऊ शकते. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यात लक्ष घालून वास्तव समोर आणल्यास गैरसमज दूर होतील, अशी नागरिकांची मागणी आहे.