शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

जामखेड मंडळात नुकसानीच्या पंचनाम्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:34 IST

जामखेडसह भोकरवाडी, माळेवाडी, लेभेंवाडी, ठाकुरवाडी, बक्षेवाडी, नागेशवाडी, नारळवाडी, विठ्ठलवाडी, जोगेश्वरवाडी, पिंपरखेड, चिंचखेड, राहुवाडी, गंगारामतांडा, शिरनेर, मठजळगाव, बोडखा आदी गावांत ...

जामखेडसह भोकरवाडी, माळेवाडी, लेभेंवाडी, ठाकुरवाडी, बक्षेवाडी, नागेशवाडी, नारळवाडी, विठ्ठलवाडी, जोगेश्वरवाडी, पिंपरखेड, चिंचखेड, राहुवाडी, गंगारामतांडा, शिरनेर, मठजळगाव, बोडखा आदी गावांत अतिवृष्टी थैमान घातले आहे.

शेतकऱ्यांनी शेतात हजारो रुपये खर्च करून पेरणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मक्का, बाजरी, तुरी ही पिके पावसाने जमीनदोस्त झाली आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून पिकांवर लावलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच यंदाही अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावला आहे. जामखेड मंडळात ३० ऑगस्ट रोजी ९९ मिमी, ०४ सप्टेंबर ११७, ०७ सप्टेंबर १६५ असा एकूण ३८१ मिमी पाऊस झाल्याने २१ गावांतील ११ हजार ५०० शेतकऱ्यांचे दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान आहे. झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. असे असतानाही जामखेड मंडळात पंचनाम्याला सुरूवात करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहे.

जामखेड परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, ऊस, तुरी, बाजरी ही पिके वाहून गेली आहे. नुकसान होऊन चार दिवसांचा कालावधी उलटला आहे. अद्यापही पंचनामे करण्यात आले नाही. प्रशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी

महेश औटी, भवानीसिंग चौहान यांनी केली आहे.