शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याच्या औद्योगिक वसाहतीला उद्योगांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:13 IST

जालन्यात जवळपास साडेतीनशे हेक्टरवर औद्योगिक वसाहतींचा तिसरा टप्पा उभारण्यात आला आहे. सध्या या भागात केवळ तीन उद्योजकांनी त्यांचे कारखाने सुरू केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई, पुणे परिसरात उद्योग उभारणीला आता जागा शिल्लक नसल्याने अनेकांनी औरंगाबाद, जालना येथे उद्योग उभारणीला प्राधान्य दिले होते. मात्र आज नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. जालन्यात जवळपास साडेतीनशे हेक्टरवर औद्योगिक वसाहतींचा तिसरा टप्पा उभारण्यात आला आहे. या परिसरात २२० केव्हीचे वीज उपकेंद्र तसेच जलवाहीनी आणि रस्ते तसेच पथदिवे बसविले आहेत. तसेच या भागातील भूखंडाचे वितरण हे यापूर्वीच लिलाव पध्दतीने झाले आहे. असे असताना अनेकांनी येथे उद्योग उभारणीसाठी भूखंड खरेदी केले आहेत, मात्र प्रत्यक्षात उद्योग उभारणीसाठी अद्याप गुंतवणूक करण्यास कोणी पुढे येत नसल्याचे वास्तव आहे. सध्या या भागात केवळ तीन उद्योजकांनी त्यांचे कारखाने सुरू केले आहेत.जालना येथे या औद्योगिक विकासाच्या तिसऱ्याटप्प्यामुळे पूर्वीच्या दोन टप्प्यातील उद्योगांनी त्यांचा विस्तार करण्यासाठी येथे भूखंड घेतले आहेत. परंतु सध्या मंदीचे वातावरण असल्याने येथे स्थानिक उद्योजक गुंतवणुकीचे धाडस करत नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान मुंबई, पुणे येथील उद्योजकांनी देखील येथे येणे टाळले असून, त्यांचा भर हा औरंगाबाद येथील दिल्ली ते मुंबई कॉरिडोरमध्ये जागा मिळावी हा हेतू असल्याने जालन्यात एकही मोठा उद्योग गेल्या पाच वर्षात आलेले नाही.जालना शहरातील औद्योगिक वसहातीत दोन आणि जालना तालुक्यातीलच रामनगर येथे आणखी एक ७० कोटी रूपयांचे २२० केव्हीचे उपकेंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे जालन्यातील विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. या केंद्रामुळे उद्योगांना हवा तेवढा वीजपुरवठा मिळू शकतोे. तसेच या केंद्रातून आता काही स्टील उद्योजकांनी त्यांच्या कंपनीजवळ १३२ केव्हीचे उपकेंद्र उभारली असून, थेट २२० केंद्रातून येथे वीज वाहून नेली जात आहे. मध्यंतरी जालन्यातील २२० उपकेंद्र थेट अकोला जिल्ह्यातील खापरखेडा येथील वीज निर्मिती केंद्राशी जोडण्याचा प्रस्ताव होता.

टॅग्स :JalanaजालनाMIDCएमआयडीसी