शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

रोहिलागड येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST

रोहिलागड गावाची लोकसंख्या सात हजारांपेक्षा अधिक आहे. गावाला ग्रामपंचायतीच्या नऊ विहिरी आहेत. तीन पाइपलाइन असून, नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला ...

रोहिलागड गावाची लोकसंख्या सात हजारांपेक्षा अधिक आहे. गावाला ग्रामपंचायतीच्या नऊ विहिरी आहेत. तीन पाइपलाइन असून, नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस झाला. यामुळे विहिरी तुडुंब भरल्या आहेत. परिणामी, पाण्याचा प्रश्न सुटला आहे. असे असतानाही गावात मागील १२ दिवसांपासून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने विद्युत मोटार सुरू होत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. याबाबत अंबड येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली; परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मुबलक पाणीसाठा असतानाही नागरिकांना शेंदून पाणी आणावे लागत आहे. काही ग्रामस्थांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. याबाबत वीज वितरणचे उपअभियंता दारकोंडे यांना विचारले असता, त्यांनी चौकशी करून सांगतो, असे सांगितले. परिसरात दरवर्षी दुष्काळी परिस्थिती असते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंंती करावी लागते. यंदा चांगला पाऊस झाल्याने पाणीटंचाईचा प्रश्न सुटला होता; परंतु आता विजेअभावी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.