शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

दक्षता व गुणनियंत्रक विभागाची तपासणी संशयाच्या फे-यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:19 IST

राज्य शासनाच्या विशेष निधीतून शहरातील प्रमुख मार्गांच्या केलेल्या काँक्रिटीकरणाची दक्षता व गुणनियंत्रक विभागाच्या पथकाने केलेली तपासणी संशयाच्या फे-यात सापडली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासनाच्या विशेष निधीतून शहरातील प्रमुख मार्गांच्या केलेल्या काँक्रिटीकरणाची दक्षता व गुणनियंत्रक विभागाच्या पथकाने केलेली तपासणी संशयाच्या फे-यात सापडली आहे, तर दुसरीकडे संबंधित अपूर्ण कामांची बिले काढण्यात आलेली नाहीत. याची तपासणी झाल्यानंतरच ती काढली जातील, असे सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एन. देवरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या कामांची पुन्हा तपासणी करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.शहरातील काही भागांत निजामकालीन सिमेंट रस्ते आजही आढळून येतात. ९० ते शंभर वर्षांनंतरही हे रस्ते सुस्थितीत आहेत. परंतु आजकाल शहरातील इतर झालेले डांबराचे रस्ते सहा महिनेही टिकत नसल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.एकाच रस्त्याचे दर सहा महिन्यांनी नव्याने डांबरीकरण केले जात आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी रस्त्यांचे आयुष्य वाढावे व ते दीर्घकालीन टिकावे यासाठी यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय खा. रावसाहेब दानवे यांनी घेतला. त्यासाठी त्यांनी राज्य शासनाकडून २५ कोटी रुपयांचा निधी आणला. मात्र, या कामांच्या मूळ उद्देशालाच हारताळ फासला गेल्याचे दिसून येत आहे. एक वर्षांपासून रस्त्यांचे काँक्रिटीकरण व इतर कामे रखडली आहेत.अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक वा एम-४० पद्धतीची कामे अपेक्षित असताना ती झालेली नाही. नागरिकांतून ओरड झाल्यानंतर यावर थातूरमातूर सिमेंट रस्ते तयार करण्यात आले.विशेष म्हणजे काँक्रिटीकरण झालेल्या सर्व रस्त्यांच्या कामांचा दर्जा व वापरण्यात आलेल्या साहित्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुणनियंत्रक विभागाच्या पथकाने तपासणी केल्याचे समजते. या पथकाच्याही ही बाब निदर्शनास आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पथकाने बारकाईने साहित्याची तपासणी व कामांचा दर्जा तपासला गेला असता तर तात्काळ हीच कामे पुन्हा दर्जेदार केली गेली असती. शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राज्य शासनाकडून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधी विनियोग चांगल्या प्रकारे होऊ शकलेला नाही. केवळ कोट्यवधी रुपयांचा निधी आणून शहराचा विकास होणार नाही, तर तो निधी योग्य प्रकारे खर्च होतोय की नाही, यावरही लोकप्रतिनिधींनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.