शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

दक्षता व गुणनियंत्रक विभागाची तपासणी संशयाच्या फे-यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:19 IST

राज्य शासनाच्या विशेष निधीतून शहरातील प्रमुख मार्गांच्या केलेल्या काँक्रिटीकरणाची दक्षता व गुणनियंत्रक विभागाच्या पथकाने केलेली तपासणी संशयाच्या फे-यात सापडली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासनाच्या विशेष निधीतून शहरातील प्रमुख मार्गांच्या केलेल्या काँक्रिटीकरणाची दक्षता व गुणनियंत्रक विभागाच्या पथकाने केलेली तपासणी संशयाच्या फे-यात सापडली आहे, तर दुसरीकडे संबंधित अपूर्ण कामांची बिले काढण्यात आलेली नाहीत. याची तपासणी झाल्यानंतरच ती काढली जातील, असे सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एन. देवरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या कामांची पुन्हा तपासणी करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.शहरातील काही भागांत निजामकालीन सिमेंट रस्ते आजही आढळून येतात. ९० ते शंभर वर्षांनंतरही हे रस्ते सुस्थितीत आहेत. परंतु आजकाल शहरातील इतर झालेले डांबराचे रस्ते सहा महिनेही टिकत नसल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.एकाच रस्त्याचे दर सहा महिन्यांनी नव्याने डांबरीकरण केले जात आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी रस्त्यांचे आयुष्य वाढावे व ते दीर्घकालीन टिकावे यासाठी यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय खा. रावसाहेब दानवे यांनी घेतला. त्यासाठी त्यांनी राज्य शासनाकडून २५ कोटी रुपयांचा निधी आणला. मात्र, या कामांच्या मूळ उद्देशालाच हारताळ फासला गेल्याचे दिसून येत आहे. एक वर्षांपासून रस्त्यांचे काँक्रिटीकरण व इतर कामे रखडली आहेत.अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक वा एम-४० पद्धतीची कामे अपेक्षित असताना ती झालेली नाही. नागरिकांतून ओरड झाल्यानंतर यावर थातूरमातूर सिमेंट रस्ते तयार करण्यात आले.विशेष म्हणजे काँक्रिटीकरण झालेल्या सर्व रस्त्यांच्या कामांचा दर्जा व वापरण्यात आलेल्या साहित्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुणनियंत्रक विभागाच्या पथकाने तपासणी केल्याचे समजते. या पथकाच्याही ही बाब निदर्शनास आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पथकाने बारकाईने साहित्याची तपासणी व कामांचा दर्जा तपासला गेला असता तर तात्काळ हीच कामे पुन्हा दर्जेदार केली गेली असती. शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राज्य शासनाकडून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधी विनियोग चांगल्या प्रकारे होऊ शकलेला नाही. केवळ कोट्यवधी रुपयांचा निधी आणून शहराचा विकास होणार नाही, तर तो निधी योग्य प्रकारे खर्च होतोय की नाही, यावरही लोकप्रतिनिधींनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.