शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

लॉकडाऊनचा बळी; उदरनिर्वाह बंद झाल्याने रिक्षाचालकाने संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 19:58 IST

सायंकाळी सात वाजले तरी घरी न आल्याचे पत्नी तसेच मुलाने त्यांचा शोध घेतला.

ठळक मुद्देआत्महत्या करण्याआधी चिठ्ठीत देविदास तळेकर यांनी चिठ्ठी लिहिली.

आव्हाना (जि. जालना) : कोरोना विषाणूमुळे गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे भोकरदन तालुक्यातील परेजापूर येथील रिक्षा चालक देवीदास भगवान तळेकर (४०) यांनी बुधवारी विष घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करण्याआधी चिठ्ठीत देविदास तळेकर यांनी चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत त्यांनी लिहिले की, ‘आपण रिक्षा घेण्यासाठी सहकारी बँक, पतसंस्थांकडून पाच लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्याची चिंता सतावत होती. त्यातच गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे वाहतुकीवर बंधने आल्याने रिक्षाची चाके ठप्प होती. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातही यंदा पैशांअभावी पेरणी करता आली नाही. त्यामुळे आपण जीवन संपवित आहोत.’ देविदास तळेकर यांना पेरजापूर येथे एक एकर शेती आहे. मंगळवारी सायंकाळी सकाळपासून देविदास तळेकर हे घरी आले नव्हते. सायंकाळी सात वाजले तरी घरी न आल्याचे पत्नी तसेच मुलाने त्यांचा शोध घेतला. 

यावेळी गावातील काही जणांना देविदासच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांना तातडीने उपचारासाठी आव्हाना येथील आरोग्य केंद्रात नेले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याJalanaजालनाcorona virusकोरोना वायरस बातम्या