शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
4
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
5
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
6
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
7
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
8
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
9
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
10
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
11
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
12
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
13
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
14
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
15
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
16
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
17
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
18
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
19
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
20
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."

वचक संपला...जालन्यात मुंबई-कल्याण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST

गेल्या वर्षभरापासून जालना शहर चांगलेच चर्चेत आले आहे. याचा परिणाम हा सर्वसामान्य माणसांवर प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे होत आहे. शहरात ...

गेल्या वर्षभरापासून जालना शहर चांगलेच चर्चेत आले आहे. याचा परिणाम हा सर्वसामान्य माणसांवर प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे होत आहे. शहरात व्यापार, उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे काही मूठभर चुकीच्या नागरिकांनी आपल्या लाभासाठी वाट्टेल ते करून लाभ उचलण्याची जणूकाही सुपारीच घेतली आहे. यामुळे अनेक गट-तट पडले असून, यातूनच गोळीबार होणे, गावठी कट्टे सापडणे, चोरी, दरोड्यांचे प्रकार वाढले आहेत. यातून वर्दीचा धाक कमी झाल्याचे समोर येत आहे. पूर्वी वर्दीतील एक माणूस दिसला तरी मोठा जमाव शांत होत होता. आज तसे चित्र दुर्मीळ होताना दिसून येत आहे.

समृद्धी महामार्ग जालना शहराजवळून गेल्याने जवळपास एकट्या जालन्यात ७०० कोटी रूपयांपेक्षा अधिकचा मावेजा मिळाला आहे. त्यातून ऐन मंदीतही जिल्ह्यात सर्वत्र अर्थसंपन्न वातावरण होते. आलेल्या या पैशांची योग्य पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी जमीन खरेदीचे व्यवहार वाढले. यातूनच स्पर्धा होऊन अनेकजण या-ना त्या मार्गाने एकमेकांची उणीदुणी काढताना दिसत आहेत. कुठल्याही मुद्यावरून ब्लॅकमेल करून पैसा ओरबाडण्याचे जणूकाही शहरात पेव फुटले आहे. या व्यावसायिक स्पर्धेतून गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचे दिसून येते. वाळूचा अवैध उपसा असो की, दोन दिवसांपूर्वी येथील व्यापाऱ्याच्या अपरहणाच्या मुद्यावरून जालना पुन्हा चर्चेत आले आहे.

या आधी देखील बांधकाम व्यावसायिक गौतम मुनोत यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सिंघवी यांच्यावर गोळीबाराच्या घटनांना उजाळा मिळाला आहे. त्या सर्व प्रकरणांमध्ये देखील पोलिसांकडून अपेक्षित असणारा सडेतोड तपास लागलेला नाही. यासह शहरातील खासगी सावकारी वाढली असून, यावर कोणी तक्रार करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, जोपर्यंत तक्रार येत नाही, तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे. एकूणच बहुतांश राजकीय पक्षांकडून गुंड प्रवृत्तीना मिळणारे संरक्षण आणि पोलिसांची ढीलाई यामुळे गुन्हेगारीला एक प्रकारे प्रतिष्ठा मिळत असल्याचे चित्र सध्या जिल्हाभरात निर्माण होत आहे. हे कुठे तरी थांबवून शहरातील गुन्हेगारांचा कणा शोधून त्याचा बिमोड करण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासन आणि राजकीय पक्षांच्या नेत्यासमोर निर्माण झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.