शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

मराठवाड्यातील ३२५ बसेसचा मुंबईत उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:28 IST

कोरोना : लोकल रेल्वे बंद असल्याचा परिणाम जालना : कोरोनामुळे बंद असलेली मुंबईतील लोकल रेल्वेसेवा अद्याप पूर्ववत झाली नाही. ...

कोरोना : लोकल रेल्वे बंद असल्याचा परिणाम

जालना : कोरोनामुळे बंद असलेली मुंबईतील लोकल रेल्वेसेवा अद्याप पूर्ववत झाली नाही. यातच व्यवसायासह नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना सेवा देणारी बेस्ट बसेस कमी पडत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासनाने मराठवाड्यातील ३५० बसेस मुंबईत चालविण्यासाठी प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत. याला दीड महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे.

मुंबईत आजही नोकरदारांसह व्यवसाय करणाऱ्यांची संख्या कमी नाही. तेथे घराबाहेर पडताना दुचाकीला प्राधान्य दिले जात नसून, लोकल रेल्वेला अधिकची पसंती दिली जाते. असे असतानाच कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद झालेली मुंबईतील लोकल रेल्वे अद्याप पूर्व पदावर आलेली नाही. यातच शासन स्तरावरून कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या अटी हळूहळू शिथिल केल्या जात आहेत. त्यामुळे मुंबईत घराबाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. याचा परिणाम बेस्ट बसेसवर होत आहे. ही बाब ओळखून मुंबईतील बेस्ट प्रशासनाने मराठवाड्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ३५० बसेस प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत. या बसेस मुंबईतील लोकल रेल्वे सुरू हो‌ईपर्यंत ठेवल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वाहक- चालकांची तपासणी

मुंबईत बेस्टद्वारे चालविण्यात येत असलेल्या रा.प.च्या बसेसवर प्रत्येक विभागातून १५ दिवसाला नव्याने चालक- वाहक पाठविले जातात. कोरोनामुळे मुंबईत सेवा बजावून गावाकडे येणाऱ्या चालक- वाहकांची तेथेच कोरोना तपासणी केली जाते. यात कुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यावर तेथेच उपचार केले जातात.

विभागनिहाय बसेस

नांदेड ५०

परभणी ५०

औरंगाबाद ५०

बीड ५०

उस्मानाबाद ५०

जालना २५

लातूर ५०