शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

दोन हजार कृषी पंप बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:37 IST

रबीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेली वीज बिल वसुली मोहीम महावितरणने पुन्हा हाती घेतली आहे. परतूर तालुक्यातील आष्टी परिसरातील अडीचशे रोहित्रांवरील सुमारे दोन हजार कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : रबीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेली वीज बिल वसुली मोहीम महावितरणने पुन्हा हाती घेतली आहे. परतूर तालुक्यातील आष्टी परिसरातील अडीचशे रोहित्रांवरील सुमारे दोन हजार कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे दोन हजार कृषी पंप बंद पडले आहेत. ऐनवेळी केलेल्या कारवाईमुळे पिकांना पाणी देण्याचे काम ठप्प झाले असून शेतक-यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.शेतक-यांनी कृषीपंपाचे चालू थकीत वीलबिल भरावे, यासाठी नोव्हेबर महिन्यातच महावितरणने कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम होती घेतली होती. रबीच्या पेरणीची पूर्वतयारी सुरू असताना मोहीम हाती घेतल्याने शेतक-यांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्यामुळे महावितरणने थकीत रक्कम भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली. या कालावधीत काही शेतक-यांनी रक्कम जमा केली, तर काहींनी केलीच नाही. त्यामुळे मुदत संपूनही विजेचा भरणा न करणाºया शेतक-यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने पुन्हा सुरू केली आहे.शनिवारी परिसरातील तब्बल दोन हजार शेतक-यांच्या कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये रायगव्हाण, आष्टी, वहिगाव सातारा, सुरूमगाव, चांगतपुरी, लोणी, गोळेगाव आदी गावांचा समावेश आहे. मुबलक पाणी असताना केवळ वीज नसल्याने पिकाला कसे द्यायचे असे आव्हान निर्माण झाले आहे. पिकांना पाण्याची गरज असताना वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे.