शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन हजार कृषी पंप बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:37 IST

रबीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेली वीज बिल वसुली मोहीम महावितरणने पुन्हा हाती घेतली आहे. परतूर तालुक्यातील आष्टी परिसरातील अडीचशे रोहित्रांवरील सुमारे दोन हजार कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : रबीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेली वीज बिल वसुली मोहीम महावितरणने पुन्हा हाती घेतली आहे. परतूर तालुक्यातील आष्टी परिसरातील अडीचशे रोहित्रांवरील सुमारे दोन हजार कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे दोन हजार कृषी पंप बंद पडले आहेत. ऐनवेळी केलेल्या कारवाईमुळे पिकांना पाणी देण्याचे काम ठप्प झाले असून शेतक-यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.शेतक-यांनी कृषीपंपाचे चालू थकीत वीलबिल भरावे, यासाठी नोव्हेबर महिन्यातच महावितरणने कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम होती घेतली होती. रबीच्या पेरणीची पूर्वतयारी सुरू असताना मोहीम हाती घेतल्याने शेतक-यांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्यामुळे महावितरणने थकीत रक्कम भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली. या कालावधीत काही शेतक-यांनी रक्कम जमा केली, तर काहींनी केलीच नाही. त्यामुळे मुदत संपूनही विजेचा भरणा न करणाºया शेतक-यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने पुन्हा सुरू केली आहे.शनिवारी परिसरातील तब्बल दोन हजार शेतक-यांच्या कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये रायगव्हाण, आष्टी, वहिगाव सातारा, सुरूमगाव, चांगतपुरी, लोणी, गोळेगाव आदी गावांचा समावेश आहे. मुबलक पाणी असताना केवळ वीज नसल्याने पिकाला कसे द्यायचे असे आव्हान निर्माण झाले आहे. पिकांना पाण्याची गरज असताना वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे.