शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
2
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
4
ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
5
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
6
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
8
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
9
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."
10
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
11
प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
12
'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
13
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
14
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
15
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
16
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
17
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
18
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
19
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
20
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती

समृध्दी महामार्गासाठी दोन इंटरचेंजचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:41 IST

मुंबई ते नागपूर या समृध्दी महामार्गसाठी जालना शहरातसह प्रस्तावित ड्रायपोर्ट येथे जाता यावे म्हणून दोन इंटरचेंज पॉइंट अर्थात समृध्दी एक्स्प्रेस वेला जोडणारा रस्ता मंजूर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई ते नागपूर या समृध्दी महामार्गसाठी जालना शहरातसह प्रस्तावित ड्रायपोर्ट येथे जाता यावे म्हणून दोन इंटरचेंज पॉइंट अर्थात समृध्दी एक्स्प्रेस वेला जोडणारा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय जवळपास झाला असून, येत्या पंधरा दिवसात या संबंधिची अधिसूचना निघणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.मुंबई ते नागपूर या महामार्गासाठी जालना जिल्ह्यातील २५ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. यासाठी जवळपास ८५ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. या संपादनामुळे या भागातील ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित झाल्या आहेत, अशा शेतक-यांना अंदाजे ५०० कोटी रूपयांपेक्षा जास्तीचा मावेजा मिळाला असून, आता केवळ आंबेडकरवाडी परिसरातील मोजणी तसेच त्या शेतक-यांची रजिस्ट्री राहिली आहे.ही रजिस्ट्री करताना आता नवीन भूसंपादनाच्या कायद्यानुसार करण्यात येणार आहे. यात पूर्वी ज्या शेतक-यांनी त्यांच्या जमिनी या महामर्गासाठी संपादित करण्यासाठी अटकाव केला होता, त्यांच्या शेतजमिनी सरकार आता सक्तीने संपादित करणार आहे. तसेच पूर्वी पाच पट भाव दिला जात होता, तो आता या नवीन भूसंपादन आदेशामुळे चार पटच देण्यात येणार आहे.या संदर्भातील अध्यादेश रस्ते विकास महामंडळाने प्रसिध्द केला आहे.जालन्यात जुन्या जागेवर इंटरचेंज पॉइंट व्हावा म्हणून संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष म्हणून नारायण गजर व समितीच्या अन्य पदाधिका-यांनी यासाठी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनामुळेच हे शक्य झाल्याचे सूत्रांनी सांगितले.जालना : दोन इंटरचेंज मुळे होणार वाहतूक सुकरजालना येथे पूर्वी ज्या भागातूना इंटरचेंज पॉईट जाणार होता, तो कायम ठेवण्यात आला आहे. तसेच भविष्यात ड्रायपोर्टची उभारणी झाल्यावर तेथे जड वाहनांना थेट प्रवेश मिळावा म्हणावा म्हणून स्वतंत्र इंटरचेंज हा निधोना,शेलगाव दरम्यान करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जुन्या इंटरचेंज परिसरा सोबतच नवीन इंटरचेंज पॉइंट करण्या मागे पुढील ५० वर्षाचा वाहतूकीचा अभ्यास करण्यात आला आहे. जुन्या इंटरचेंज पॉइंटवरून ही जड वाहतूक करणे म्हणजे आज मोतीबाग जवळून जाणा-या बायपास अर्थात वळण रस्त्याची जी अवस्था झाली आहे, तशी होऊ शकते. त्यामुळे जड वाहनांचा त्रास भविष्यात येथे होऊ नये म्हणून हा दुसरा इंटरचेंज पॉइंट निर्माण करण्यात येणार आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गGovernmentसरकार