शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

समृध्दी महामार्गासाठी दोन इंटरचेंजचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:41 IST

मुंबई ते नागपूर या समृध्दी महामार्गसाठी जालना शहरातसह प्रस्तावित ड्रायपोर्ट येथे जाता यावे म्हणून दोन इंटरचेंज पॉइंट अर्थात समृध्दी एक्स्प्रेस वेला जोडणारा रस्ता मंजूर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई ते नागपूर या समृध्दी महामार्गसाठी जालना शहरातसह प्रस्तावित ड्रायपोर्ट येथे जाता यावे म्हणून दोन इंटरचेंज पॉइंट अर्थात समृध्दी एक्स्प्रेस वेला जोडणारा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय जवळपास झाला असून, येत्या पंधरा दिवसात या संबंधिची अधिसूचना निघणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.मुंबई ते नागपूर या महामार्गासाठी जालना जिल्ह्यातील २५ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. यासाठी जवळपास ८५ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. या संपादनामुळे या भागातील ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित झाल्या आहेत, अशा शेतक-यांना अंदाजे ५०० कोटी रूपयांपेक्षा जास्तीचा मावेजा मिळाला असून, आता केवळ आंबेडकरवाडी परिसरातील मोजणी तसेच त्या शेतक-यांची रजिस्ट्री राहिली आहे.ही रजिस्ट्री करताना आता नवीन भूसंपादनाच्या कायद्यानुसार करण्यात येणार आहे. यात पूर्वी ज्या शेतक-यांनी त्यांच्या जमिनी या महामर्गासाठी संपादित करण्यासाठी अटकाव केला होता, त्यांच्या शेतजमिनी सरकार आता सक्तीने संपादित करणार आहे. तसेच पूर्वी पाच पट भाव दिला जात होता, तो आता या नवीन भूसंपादन आदेशामुळे चार पटच देण्यात येणार आहे.या संदर्भातील अध्यादेश रस्ते विकास महामंडळाने प्रसिध्द केला आहे.जालन्यात जुन्या जागेवर इंटरचेंज पॉइंट व्हावा म्हणून संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष म्हणून नारायण गजर व समितीच्या अन्य पदाधिका-यांनी यासाठी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनामुळेच हे शक्य झाल्याचे सूत्रांनी सांगितले.जालना : दोन इंटरचेंज मुळे होणार वाहतूक सुकरजालना येथे पूर्वी ज्या भागातूना इंटरचेंज पॉईट जाणार होता, तो कायम ठेवण्यात आला आहे. तसेच भविष्यात ड्रायपोर्टची उभारणी झाल्यावर तेथे जड वाहनांना थेट प्रवेश मिळावा म्हणावा म्हणून स्वतंत्र इंटरचेंज हा निधोना,शेलगाव दरम्यान करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जुन्या इंटरचेंज परिसरा सोबतच नवीन इंटरचेंज पॉइंट करण्या मागे पुढील ५० वर्षाचा वाहतूकीचा अभ्यास करण्यात आला आहे. जुन्या इंटरचेंज पॉइंटवरून ही जड वाहतूक करणे म्हणजे आज मोतीबाग जवळून जाणा-या बायपास अर्थात वळण रस्त्याची जी अवस्था झाली आहे, तशी होऊ शकते. त्यामुळे जड वाहनांचा त्रास भविष्यात येथे होऊ नये म्हणून हा दुसरा इंटरचेंज पॉइंट निर्माण करण्यात येणार आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गGovernmentसरकार