शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या टपावर बसून प्रवास : अपुऱ्या बसेसमुळे विद्यार्थ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2016 19:45 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या अपुऱ्या बसेसमुळे विद्यार्थ्यांना आज जीव धोक्यात घालून ज्ञानार्जनासाठी जावे लागत आहे.

जालना : राज्य परिवहन महामंडळाच्या अपुऱ्या बसेसमुळे विद्यार्थ्यांना आज जीव धोक्यात घालून ज्ञानार्जनासाठी जावे लागत आहे. अनेकवेळा तर बसमध्ये जागा मिळत नसल्याने विद्यार्थी चक्क टपावर बसत असल्याचा प्रकार गुरूवारी मंठा तालुक्यातील उस्वद येथे पहावयास मिळाला.मंठा ते उस्वद यामध्ये ३० किमी. चा अंतर आहे. यादरम्यने अनेक गावांचा संपर्क येतो. उस्वद येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा असल्याने परिसरातील गावातील विद्यार्थी हे शिक्षणासाठी दररोज उस्वदला येतात. परंतु या मार्गावर बसफेऱ्या अपुऱ्या असल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. खोराड सावंगी, किनखेडा, नळडोह, किर्तापूर, पेवा, मोहदरी, अंभोरा, आंधवाडी आदी गावांतील विद्यार्थी हे उस्वद येथे शिक्षणासाठी येतात. यात विद्यार्थिनींसाठी सकाळी आणि सायंकाळी मानव विकास योजनेंतर्गतची एक बस धावते. परंतु संख्या अधिक असल्याने या बसमध्ये गर्दी होते. तसेच दुपारच्यावेळी विद्यार्थ्यांसाठी सोडण्यात येत असलेली साधी बसही अपुरी पडत असल्याने विद्यार्थी चक्क टपावर बसून प्रवास करू लागले आहेत. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. या मार्गावर जादा बसफेऱ्या वाढविण्याची मागणी पालकांसह विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.