शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

‘तोतलांनी तो भूखंड दर्गा परत करावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:08 IST

तोतला याांच्याकडून अटी व शर्थीचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप सय्यद जमील मौलाना यांनी करून त्यांच्या विरोधात औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाच्या न्यायप्राधिकरणामध्ये आव्हान दिले होते. दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर तोतला यांनी भाडेतत्ववारील जमिन दर्गा व्यवस्थापनाकडे परत करण्याचा निर्णय दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील शेरसवार दर्गाची सर्व्हे क्रमांक १०२, १०३ मधील जमीन ही सत्यनारायण तोतलांना साधारणपणे १९७२ मध्ये पेट्रोलपंप चालविण्यासाठी भाडेतत्वावर दिली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात सत्तनारायण तोतला याांच्याकडून अटी व शर्थीचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप सय्यद जमील मौलाना यांनी करून त्यांच्या विरोधात औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाच्या न्यायप्राधिकरणामध्ये आव्हान दिले होते. दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर तोतला यांनी भाडेतत्ववारील जमिन दर्गा व्यवस्थापनाकडे परत करण्याचा निर्णय दिला आहे.जालन्यातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली ही दर्गा शेरसवारची जमिन १९७२ मध्ये तोतला परिवाराने पेट्रोलपंप चालविण्यासाठी भाडेतत्वावर घेतली होती. मध्यंतरी या जमिनीचे भूभाडे देखील त्यांनी दिले नाही. तसेच ज्या उद्देशासाठी ही जमिन भाडे तत्वावर घेतली होती. त्या व्यतिरिक्त तेथे ढाबा चालविणे, हातपंप खोदून पाण्याची विक्री करणे तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी भाड्याने देणे आदी आरोप सैय्यद जमील यांनी न्याय प्राधिकारणात तोतलांच्या विरूध्द दाखल दाव्यात केले आहेत. यावर औरंबादेतील न्याय प्राधिकरणमध्ये तीन न्यायाधींच्या बोर्डा समोर सुनावणी झाली. यावेळी दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यावर प्राधिकरणने तोतला यांनी भाडे कराराचे उल्लंघन केल्याचा निर्णय दिला. तसेच ही जमिन दर्ग्याला परत देण्याचे निर्देशही तोतलांना दिले. या प्राधिकरणाच्या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान सैय्यद जमील मौलाना हे शेर सवार दर्गाचे अधिकृत मुतवली नसल्याचा आरोपही तोतला यांनी यापूर्वी केला होता. त्यातच मध्यंतरी वक्फ बोर्डाने देखील मौलाना जमील हे मुतावली नसल्याचे मान्य करून त्यांच्या विरूध्द सदरबाजार पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता.यावेळी मौलाना जमील यांना अधिकार नसतांना त्यांनी दर्गाची मोक्याची जमिन अनेकांना भाडेतत्वार करून दिल्याचे तक्रारीत म््हटले होते. यावरून त्यांना अटक होऊन कोठडीही मिळाली होती.निर्णयाला आव्हान देणारआम्ही कुठलेही कराराचे उल्लंघन केलेले नाही. चुकीच्या पध्दतीने आमच्यावर आरोप ठेवून आम्हाला बदनाम केले जात आहे. परंतु वास्तव परिस्थिती वेगळी आहे. यापूर्वी देखील वेगवेगळ्या न्यायिक प्रकरणात मौलाना सैय्यद जमील यांच्या विरोधात निकाल गेले आहेत. परंतु आता वक्फ बोर्डाच्या न्याय प्राधिकरणाने जो निकाल दिला आहे. त्याचा आपण आमच्या वकीलामार्फत अभ्यास करणार आहोत. त्या नंतर या प्राधिकरणाच्या निर्णयाला आम्ही न्यायालयात आव्हान देणार आहोत.दरम्यान ३ फ्रेब्रवारी २०१६ मध्ये वक्फ बोर्डाकडून आम्हांला माहिती अधिकारा खाली जमील मौलना यांची मुतवली म्हणून नेकणूक केली नसल्याचे त्यात म्हटले होते. - सत्यनारायण तोतला, पेट्रोलपंपाचे मालक.

टॅग्स :Courtन्यायालयReligious Placesधार्मिक स्थळे