शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

जालन्यात शौचालयाचे अनुदान घेऊन लाभार्थी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 21:12 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत (नागरी) स्वच्छतागृह बांधण्यासाठी अनुदान घेऊन प्रत्यक्ष स्वच्छतागृहाचे बांधकाम न करणा-या १४१ लाभार्थ्यांवर बुधवारी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौ

ठळक मुद्दे१४१ जणांवर गुन्हे दाखल पालिकेच्या अधिका-यांना शौचालयांचा शोध

जालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत (नागरी) स्वच्छतागृह बांधण्यासाठी अनुदान घेऊन प्रत्यक्ष स्वच्छतागृहाचे बांधकाम न करणा-या १४१ लाभार्थ्यांवर बुधवारी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौचालये बांधकाम अनुदानाचा हा गैरव्यवहार नऊ लाखांवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जालना नगर पालिकेला शहरात १३ हजार २०० वैयक्तिक स्वच्छतागृह उभारणीचे उद्दिष्ट होते. यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला शासनाकडून १२ हजारांचे तर पालिकेकडून पाच हजारांचे, असे एकूण १७ हजारांचे अनुदान  निश्चित करण्यात आले. यासाठी स्वच्छतागृह नसलेल्या नागरिकांकडून वर्षभरापूर्वी अर्ज मागविण्यात आले.

निकषांची पूर्तता न करता प्राप्त अर्जांची  छाननी करण्यात आली. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून बँक खात्यावर स्वच्छतागृहांच्या बांधकामाच्या टप्प्यानुसार अनुदान जमा करण्यात आले होते. मात्र, काही लाभार्थ्यांनी स्वच्छतागृहांचे बांधकाम न करता अनुदान उचलल्याच्या तक्रारी आल्यांनतर पालिकेने पथक स्थापन करून अनुदान घेतलेल्या लाभार्थ्यांचा शोध सुरू केला.

शहरातील नूतनवसाहत, कन्हैयानगर, लालबाग,  इंदिरानगर, कैकाडी मोहल्ला, मंगळबाजार भागातील सुमारे पाचशेहून अधिक लाभार्थ्यांचा शोध या पथकाला लागला नाही. त्यामुळे नगर पालिकेने काही महिन्यांपूर्वी ४६७ जणांविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यापैकी काही लाभार्थ्यांचा शोध लागला. मात्र, १४१ लाभार्थ्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही.

त्यामुळे या लाभार्थ्यांनी शासन अनुदानाचा गैरवापर केल्याप्रकरणी स्वच्छता निरीक्षक पंडित पवार यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोन लागतोय पण दुस-याच जिल्ह्यातस्वच्छतागृहाचे अनुदान लाटणा-या लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी नियुक्त पथक दिलेल्या पत्त्यावर गेल्यानंतर अशा नावाची व्यक्ती या भागात राहत नसल्याचे आजूबाजूचे सांगत आहे अर्जावर दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क केल्यानंतर उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातील व्यक्तींना फोन लागत असल्याने शोध पथकातील कर्मचारी वैतागले आहेत.

स्वच्छतागृहांचे बांधकामही अपूर्णस्वच्छता अभियानांतर्गत जालना शहरात १३ हजार वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, दोन वेळा मूदतवाढ देऊनही हे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. शहर संपूर्ण हगणदारीमुक्त झाल्याचे पालिका सांगत असली तरी प्रत्यक्षात अनेक भागांत नागरिक उघड्यावर शौचास जातात. स्वच्छता अभियानांतर्गत जालना शहराची केंद्रीय पथकाकडून होणारी तपासणीही अद्याप झालेली नाही.