शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

भाजपला धडा शिकविण्याची हीच वेळ- धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:55 IST

भोकरदन : शेतकरी आणि सर्वसामान्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भ्रमनिरास करणा-या भाजप सरकारला धडा शिकविण्याची हीच निर्णायक वेळ आहे, ...

भोकरदन : शेतकरी आणि सर्वसामान्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भ्रमनिरास करणा-या भाजप सरकारला धडा शिकविण्याची हीच निर्णायक वेळ आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी गटनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भोकरदन येथील उपविभागीय कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या वतीने सोमवारी करण्यात आलेल्या हल्लोबाल आंदोलनात त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्यावरही टीका केली.पंचायत समिती कार्यालयापासून या हल्लाबोल मोर्चाला दुपारी तीन वाजता सुरुवात झाली. माजी मंत्री तथा आ. राजेश टोपे, आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, माजी खा़ पुंडलिकराव दानवे, माजी आ़ चंद्रकांत दानवे, माजी आ़ कल्याण काळे, राजाभाऊ देशमुख, डॉ. निसार देशमुख, कदीर मौलाना, बबलू चौधरी, लक्ष्मण ठोंबरे, राजेश चव्हाण, सुधाकर दानवे, रामदास पालोदकर, केशवराव तायडे, इरफानउद्दिन सिद्दीकी, दीपक वाकडे, केशव जंजाळ, नय्युम कादरी, महेश औटी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैलगाडीसह काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतकरी व सर्वसामान्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपविभागीय कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.यावेळी मुंडे म्हणाले, की भाजप सरकारच्या काळात महागाईने कळस गाठला आहे. शेतमालास भाव नाही, जीएसटीमुळे व्यापारी अडचणीत आला आहे. कर्जमाफीची घोषणा केली, परंतु अद्याप एकाही शेतक-याला त्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघात जनता हैराण झाल्याने या मोेर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकºयाना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस १२ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी खा. रावसाहेब दानवे व आ. संतोष दानवे यांच्या कारभारावर चौफेर टीका केली.---------------घड्याळाला हाताची साथभोकरदन येथील राष्ट्रवादीच्या या हल्लाबोल मोर्चासाठी काँॅग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदार संघातून मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या घड्याळाला काँग्रेसचा हात मिळाल्यामुळे मोर्चा यशस्वी झाल्याची चर्चा होती.-----------------दानवेंना पराभूत करीन, तेव्हाच डोक्यावर केस- सत्तारअर्जुनास्त्राच्या मदतीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे यांचा येणा-या लोकसभा निवडणुकीत पराभव केल्यानंतरच आपण डोक्यावर केस ठेवू. उंदरांनीच देशमुखांच्या गढ्या पोखरल्या, हे आम्हाला उंदरांच्या फौजा समजणा-यांनी लक्षात ठेवावे. कल्याण काळेंचा सुध्दा बिस्मिल्ला आपणच केला, असे सत्तार म्हणाले.------------...तरच भाजप प्रदेशाध्यक्षांचे वजनआ़ टोपे म्हणाले की, भाजपाच्या सरकारातील नेत्यांनी शेतक-यांना कर्जमाफी मिळण्याआधीच जागोजागी अभिनंदनाचे होर्डिंग लावून उतावळेपणाचा कळस गाठला. बोंडअळीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी ५०० रुपये बोनस मिळवून दिले तर त्यांचे सरकारमध्ये वजन आहे, असे आपण समजू.------------------