शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

प्रति माह तीन हजार कुटुंबांना मिळाले मोफत धान्य; पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोरोनातील लॉकडाऊनमध्ये गरजूंना आधार ठरलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य वाटपाची डेडलाइन संपली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : कोरोनातील लॉकडाऊनमध्ये गरजूंना आधार ठरलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य वाटपाची डेडलाइन संपली आहे. त्यामुळे आता ज्यांच्या हाताला अद्यापही काम नाही, अशा गरजूंची मोठी गैरसोय होणार असल्याचे चित्र आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या. हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. ही बाब पाहता केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत मोफत धान्य वाटप केले. जिल्ह्यात प्रति माह सरासरी तीन हजारांवर कुटुंबांना याचा लाभ मिळाला. यात १७ हजार ५१६ टन गहू, ३७ हजार ६०५ टन तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. यात डाळिंचेही मोफत वाटप करण्यात आले आहे. मात्र, मोफत धान्य वाटपाची डेडलाइन आता संपली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अनेकांच्या हाताला अद्याप काम मिळालेले नाही. काही व्यवसाय, कंपन्या बंद असल्याने तेथील कामगारांचेही प्रश्न कायम आहेत. त्यामुळे गरजूंना मोफत धान्य वाटपाची मागणी होत आहे.

रोजगाराचा प्रश्न कायम आहे, पोट कसे भरणार

मोफत धान्य वाटपामुळे गरजूंना मोठा आधार मिळाला. लॉकडाऊन शिथिल असले तरी आजही आमच्या अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे आर्थिक स्थिती कोलमडलेलीच आहे. त्यामुळे पोट कसे भरायचे? असा प्रश्न असून, शासनाने गरजूंना मोफत धान्य वाटप करावे, अशी मागणी वडीगोद्री येथील अविनाश खरात यांनी केली.

हाताला काम नसल्याने अनेक प्रश्न कायम

लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी आजही आमच्यासारख्या अनेक गरजूंच्या हाताला काम मिळालेले नाही. त्यामुळे घरातील आर्थिक स्थिती बेताचीच आहे. त्यात आता मोफत धान्य मिळणार की नाही? हा प्रश्न कायम असून, मोफत धान्य वाटप करावे, अशी मागणी तीर्थपुरी येथील राजेंद्र जाधव यांनी केली.

शासन निर्देशानुसार पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्याचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय इतर शासकीय योजनांमधून कार्डधारकांना धान्य वाटप केले जात आहे. मोफत धान्य वाटपाबाबत शासनस्तरावरून, वरिष्ठस्तरावरून येणाऱ्या सूचनेनुसार काम केले जाईल.

-श्रीकांत भुजबळ, तहसीलदार