शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

‘समृद्धी’ चे तीन टप्पे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:03 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु करण्यापूर्वी एकूण १६ उपविभागांत विभाजन करण्यात आले आहे.

बाबासाहेब म्हस्के/जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु करण्यापूर्वी एकूण १६ उपविभागांत विभाजन करण्यात आले आहे. कमीत कमी वेळात प्रकल्पाचे काम पूर्ण व्हावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत १५३ किलोमीटरवरून जाणा-या या महामार्गाचे काम तीन टप्प्यांत विभागण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.नागपूर ते मुंबई ७१० किलोमीटर लांबी असलेला समृद्धी महामार्ग जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील ४० गावांमधून जाणार आहे. मराठवाड्यात या महामार्गाची लांबी १५३ किलोमीटर राहणार आहे. समृद्धी महामार्गाच्या घोषणेनंतर सुरुवातीच्या काळात महामार्गाची पाच विभागांत विभागणी करण्यात आली होती. यात विभाग एकमध्ये नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांचा समावेश होता. विभाग दोनमध्ये अमरावती, वाशिम आणि बुलडाणा, विभाग तीनमध्ये जालना आणि औरंगाबाद, विभाग चारमध्ये अहमदनगर आणि नाशिक आणि विभाग पाचमध्ये ठाणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. आता मार्चअखेर या महामार्गाचे भूमिपूजन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रत्यक्ष काम सुरू करण्याआधी कामाचे योग्य पद्धतीने विभाजन करून वेगाने काम पूर्ण करण्याचा उद्दिष्ट रस्ते विकास महामंडळाने समोर ठेवले आहे. ज्या जिल्ह्यातून महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जाणार आहे, अशा जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थती, कामाचे स्वरूप या बाबींचा विचार करून महामार्गाचे १६ भागांत विभाजन करण्यात आले. सुरुवातीला पाच विभागात झालेल्या जिल्हानिहाय विभागणीचे पुढे १६ उपविभाग करण्यात आले. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतून होणा-या समृद्धी महामार्गासाठी अनुक्रमे ४२, ५४ आणि ५७ किलोमीटर लांबीचे तीन विभाग पाडण्यात आल्याची रस्ते विकास महामंडळाच्या औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी एच. व्ही. अरगुंडे यांनी दिली.----------जिल्ह्यात पन्नास टक्के भूसंपादनजालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधून जाणा-या समृद्धी महामार्गासाठी ४४० हेक्टर २० गुंठे जमिनीचे संपादन केले जाणार आहे. यास शेतक-यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जालना तालुक्यातील तांदूळवाडी, पानशेंद्रा, नंदापूर, अहंकार देऊळगाव, थार, बदनापूर तालुक्यातील अकोला निकळक, गेवराई इ. गावांमधील २०७ हेक्टर ९१ गुंठे जमिनीच्या खरेदीखताची प्रक्रिया रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केली आहे. या शेतक-यांना मोबदल्यापोटी आतापर्यंत सुमारे २२५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.-------------कोटसमृद्धी महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन माचअखेर होईल. महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या असून संपूर्ण प्रक्रिया वेगाने सुरू आहे.-खा. रावसाहेब दानवे