शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
6
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
7
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
8
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
9
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
10
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
11
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
12
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
13
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
14
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
15
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
16
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
17
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
18
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
19
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
20
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी

‘समृद्धी’ चे तीन टप्पे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:03 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु करण्यापूर्वी एकूण १६ उपविभागांत विभाजन करण्यात आले आहे.

बाबासाहेब म्हस्के/जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु करण्यापूर्वी एकूण १६ उपविभागांत विभाजन करण्यात आले आहे. कमीत कमी वेळात प्रकल्पाचे काम पूर्ण व्हावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत १५३ किलोमीटरवरून जाणा-या या महामार्गाचे काम तीन टप्प्यांत विभागण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.नागपूर ते मुंबई ७१० किलोमीटर लांबी असलेला समृद्धी महामार्ग जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील ४० गावांमधून जाणार आहे. मराठवाड्यात या महामार्गाची लांबी १५३ किलोमीटर राहणार आहे. समृद्धी महामार्गाच्या घोषणेनंतर सुरुवातीच्या काळात महामार्गाची पाच विभागांत विभागणी करण्यात आली होती. यात विभाग एकमध्ये नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांचा समावेश होता. विभाग दोनमध्ये अमरावती, वाशिम आणि बुलडाणा, विभाग तीनमध्ये जालना आणि औरंगाबाद, विभाग चारमध्ये अहमदनगर आणि नाशिक आणि विभाग पाचमध्ये ठाणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. आता मार्चअखेर या महामार्गाचे भूमिपूजन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रत्यक्ष काम सुरू करण्याआधी कामाचे योग्य पद्धतीने विभाजन करून वेगाने काम पूर्ण करण्याचा उद्दिष्ट रस्ते विकास महामंडळाने समोर ठेवले आहे. ज्या जिल्ह्यातून महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जाणार आहे, अशा जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थती, कामाचे स्वरूप या बाबींचा विचार करून महामार्गाचे १६ भागांत विभाजन करण्यात आले. सुरुवातीला पाच विभागात झालेल्या जिल्हानिहाय विभागणीचे पुढे १६ उपविभाग करण्यात आले. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतून होणा-या समृद्धी महामार्गासाठी अनुक्रमे ४२, ५४ आणि ५७ किलोमीटर लांबीचे तीन विभाग पाडण्यात आल्याची रस्ते विकास महामंडळाच्या औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी एच. व्ही. अरगुंडे यांनी दिली.----------जिल्ह्यात पन्नास टक्के भूसंपादनजालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधून जाणा-या समृद्धी महामार्गासाठी ४४० हेक्टर २० गुंठे जमिनीचे संपादन केले जाणार आहे. यास शेतक-यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जालना तालुक्यातील तांदूळवाडी, पानशेंद्रा, नंदापूर, अहंकार देऊळगाव, थार, बदनापूर तालुक्यातील अकोला निकळक, गेवराई इ. गावांमधील २०७ हेक्टर ९१ गुंठे जमिनीच्या खरेदीखताची प्रक्रिया रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केली आहे. या शेतक-यांना मोबदल्यापोटी आतापर्यंत सुमारे २२५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.-------------कोटसमृद्धी महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन माचअखेर होईल. महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या असून संपूर्ण प्रक्रिया वेगाने सुरू आहे.-खा. रावसाहेब दानवे