शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतीपूरक ६५ उद्योग होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:28 IST

शेतातील उत्पादित मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू व्हावेत, सहकाराला बळकटी मिळावी यासाठी शासनाने जालना जिल्ह्याला ११ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.

ठळक मुद्देशेतमालावर प्रक्रिया : शासनस्तरावरून ११ कोटीचा निधी

विजय मुंडे।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतातील उत्पादित मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू व्हावेत, सहकाराला बळकटी मिळावी यासाठी शासनाने जालना जिल्ह्याला ११ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीद्वारे जिल्ह्यातील ६५ सहकारी संस्थांचे शेतीपूरक उद्योग सुरू होणार आहेत. शेतातील उत्पादित मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू होणार असल्याने याचा शेतकऱ्यांनाही लाभ होणार आहे.खासगी उद्योग, व्यवसायांमुळे सहकार क्षेत्राला घरघर लागली आहे! याचा थेट परिणाम शेतकरी, शेतमजुरांवर झाला आहे. त्यात दुष्काळाचे सावट सतत निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी मोडली आहे. परिणामी हाताला काम मिळावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून ग्रामीण भागातील युवकांचा शहराकडे ओढा वाढला असून, गावे ओस पडू लागली आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतीपूरक उद्योग गावा-गावात सुरू होणे गरजेचे आहे. या अनुषंगाने शासनाने शेती उत्पादीत मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू व्हावेत, यासाठी पावले टाकली आहेत. ग्रामीण भागातील सहकारी संस्थांनी उद्योग सुरू करावेत, सहकाराला बळकटी मिळावी यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत (एम.सी.डी.सी.) सहकारी संस्थांना उद्योगासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. जालना जिल्ह्यासाठी ११ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सहकारी संस्थांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. दाखल प्रस्तावांच्या छाननीनंतर हे प्रस्ताव महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडे पाठविण्यात आले होते. तेथून ६३ संस्थांच्या उद्योगांना मंजुरी मिळाली असून, उर्वरित दोन प्रस्तावांनाही लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. शेतीपूरक मालावर प्रक्रिया होणारे उद्योग ग्रामीण भागात सुरू झाल्यानंतर शेतकरी, शेतमजुरांनाही याचा मोठा लाभ होणार आहे.

टॅग्स :JalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्र