शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

ई-पाससाठी कारणं दोनच : रूग्णालय किंवा अंत्यसंस्कार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST

जालना : मागील काही दिवसांपासून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात ...

जालना : मागील काही दिवसांपासून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात मागील आठ दि्वसात ३ हजार १२० जणांना ई-पास देण्यात आले आहेत. यात बहुतांश जणांनी रूग्णालय व अंत्यसंस्काराला जायचे आहे, अशी कारणे दिली आहेत.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनच्या काळात आंतरजिल्हा प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ज्याला महत्त्वाचे काम आहे, त्या व्यक्तीला ई-पासमार्फत प्रवेश दिला जात आहे. जालना जिल्ह्यात २५ चेकपोस्ट उभारण्यात आली आहेत. या चेकपोस्टवर जवळपास ७५ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ज्या व्यक्तीकडे पास आहे, त्यांनाच प्रवेश दिला जात आहे. जालना जिल्ह्यातून आतापर्यंत ३ हजार १२० जणांना पास देण्यात आले आहेत. पास काढण्यासाठी नागरिकांनी वेगवेगळी कारणे दिली आहेत. यात प्रामुख्याने अंत्यसंस्कारासाठी चाललो आहे किंवा रूग्णालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी जायचं आहे, अशी कारणे देण्यात आली आहे.

ही कागदपत्रे हवीत

ई-पाससाठी जिल्हा पोलीस दलाकडून प्रसिध्द केलेल्या संकेतस्थळावर दररोज मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. मात्र, बहुतांश अर्जदार केवळ माहिती भरून अर्ज सबमिट करतात. त्यासाठी आवश्यक कारण काय आहे, हे नमूद करत नाहीत. तसेच अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रेही अपलोड करत नाहीत. त्यामुळे अशा ई-पासला मंजुरी दिली जात नाही. नागरिकांनी प्रवासाचे योग्य कारण दिले व आवश्यक ती कागदपत्रे अपलोड केल्यास सायबर विभागाकडून परवानगी दिली जाते.

असा करावा अर्ज

पोलीस प्रशासनाने दिलेल्या वेबसाईटवर जाऊन स्वत:ची माहिती, फोटो व ज्या कामाच्या संदर्भातील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे, ती माहिती, कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जदाराला सांकेतिक क्रमांक प्राप्त होतो. हा सांकेतिक क्रमांक पुन्हा वेबसाईटवर टाकल्यास ई-पासला परवानगी दिली असेल तर पास डाऊनलोड करून घेता येतो.

दोन ते अडीच मिळतो ई-पास

नागरिकांना ई-पास देण्याची जबाबदारी सायबर विभागाकडे आहे. त्याठिकाणी दोन कर्मचाऱ्यांना यासाठी नेमण्यात आले आहे. हे कर्मचारी अर्जाची तपासणी करून पासला परवानगी देतात. नागरिकांनी अर्जात ठेवलेल्या त्रुटींची पाहणी ते ई-पासला परवानगी अशाप्रकारे काम करतात.