शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ई-पाससाठी कारणं दोनच : रूग्णालय किंवा अंत्यसंस्कार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST

जालना : मागील काही दिवसांपासून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात ...

जालना : मागील काही दिवसांपासून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात मागील आठ दि्वसात ३ हजार १२० जणांना ई-पास देण्यात आले आहेत. यात बहुतांश जणांनी रूग्णालय व अंत्यसंस्काराला जायचे आहे, अशी कारणे दिली आहेत.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनच्या काळात आंतरजिल्हा प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ज्याला महत्त्वाचे काम आहे, त्या व्यक्तीला ई-पासमार्फत प्रवेश दिला जात आहे. जालना जिल्ह्यात २५ चेकपोस्ट उभारण्यात आली आहेत. या चेकपोस्टवर जवळपास ७५ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ज्या व्यक्तीकडे पास आहे, त्यांनाच प्रवेश दिला जात आहे. जालना जिल्ह्यातून आतापर्यंत ३ हजार १२० जणांना पास देण्यात आले आहेत. पास काढण्यासाठी नागरिकांनी वेगवेगळी कारणे दिली आहेत. यात प्रामुख्याने अंत्यसंस्कारासाठी चाललो आहे किंवा रूग्णालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी जायचं आहे, अशी कारणे देण्यात आली आहे.

ही कागदपत्रे हवीत

ई-पाससाठी जिल्हा पोलीस दलाकडून प्रसिध्द केलेल्या संकेतस्थळावर दररोज मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. मात्र, बहुतांश अर्जदार केवळ माहिती भरून अर्ज सबमिट करतात. त्यासाठी आवश्यक कारण काय आहे, हे नमूद करत नाहीत. तसेच अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रेही अपलोड करत नाहीत. त्यामुळे अशा ई-पासला मंजुरी दिली जात नाही. नागरिकांनी प्रवासाचे योग्य कारण दिले व आवश्यक ती कागदपत्रे अपलोड केल्यास सायबर विभागाकडून परवानगी दिली जाते.

असा करावा अर्ज

पोलीस प्रशासनाने दिलेल्या वेबसाईटवर जाऊन स्वत:ची माहिती, फोटो व ज्या कामाच्या संदर्भातील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे, ती माहिती, कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जदाराला सांकेतिक क्रमांक प्राप्त होतो. हा सांकेतिक क्रमांक पुन्हा वेबसाईटवर टाकल्यास ई-पासला परवानगी दिली असेल तर पास डाऊनलोड करून घेता येतो.

दोन ते अडीच मिळतो ई-पास

नागरिकांना ई-पास देण्याची जबाबदारी सायबर विभागाकडे आहे. त्याठिकाणी दोन कर्मचाऱ्यांना यासाठी नेमण्यात आले आहे. हे कर्मचारी अर्जाची तपासणी करून पासला परवानगी देतात. नागरिकांनी अर्जात ठेवलेल्या त्रुटींची पाहणी ते ई-पासला परवानगी अशाप्रकारे काम करतात.