शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

जालना जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये २,३२२ महिला कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 18:38 IST

gram panchayat ४७५ पैकी २६ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली, तर ४७८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

ठळक मुद्देभोकरदन तालुक्यात सर्वाधिक महिला उमेदवारआरोग्य आणि स्वच्छतेला प्राधान्य देणार

जालना : जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. ४,१६४ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महिलांनी मोठा सहभाग घेतल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात तब्बल २,३२२ महिला निवडून आल्या आहेत.

जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संपली होती. ४७५ पैकी २६ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली, तर ४७८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ४४६ ग्रामपंचायतींच्या ३,६९८ जागांसाठी मतदान झाले. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून १२,३३२ पैकी ४,१४४ उमेदवारांनी विजय मिळविला. यात २,३२२ महिला उमेदवार आहेत.

भोकरदन तालुक्यात सर्वाधिक महिला उमेदवारजालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सर्वाधिक ४६६ महिला उमेदवार निवडून आले आहेत. त्यानंतर जालना तालुक्यात ४०८, बदनापूर- २८४, जाफराबाद- ९३, परतूर- १७८, मंठा- २३९, अंबड- ३४९ तर घनसावंगी तालुक्यात ३०५ महिला उमेदवार निवडून आल्या आहेत.

आरोग्याशी निगडित प्रश्नांना प्राधान्य मी प्रथमच ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहे. मतदारांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला निश्चितच येत्या पाच वर्षांत न्याय देण्याचा प्रयत्न करेन. टेंभुर्णी गावात सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी कुठेही स्वच्छतागृह उपलब्ध नाही. प्राधान्यक्रमाने मी महिलांच्या आरोग्याशी निगडित हा प्रश्न सर्वप्रथम सोडविण्यास प्राधान्य देईल. यासोबतच गावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करेल.- सुमन लक्ष्मण म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य

स्वच्छतेचा प्रश्न सर्वप्रथमग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रथमच मी राजकारणात प्रवेश केला आहे. टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या १७ सदस्यांत आम्ही दहा जणी निवडून आल्याने निश्चितच जनतेने या सभागृहात महिलांना झुकते माप दिले आहे. जनतेच्या या कौलाचा आदर करीत महिलांच्या प्रश्नांसोबतच गावातील स्वच्छतेचा प्रश्न सर्वप्रथम सोडविण्यास मी प्राधान्य देईल.- शिल्पा धनराज देशमुख, ग्रामपंचायत सदस्य

महिलांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी द्यावी.ग्रामपंचायत सदस्य म्हणून जनतेने मला दुसऱ्यांदा सेवेची संधी दिली आहे. मागील पंचवार्षिकला शेवटच्या कार्यकाळात एक वर्ष माझ्याकडे उपसरपंचपद होते. ग्रामसभेच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणासाठी आपण प्रयत्न केले. यापुढेही गणेशपूर व टेंभुर्णीच्या विकासात्मक कामासाठी सदैव तत्पर राहीन. पुरुषांनी महिलांच्या अधिकारावर गदा न आणता महिलांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी द्यावी.- उषा गणेश गाडेकर, ग्रामपंचायत सदस्य

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतJalanaजालना