शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

...तर दुकानांचे परवाने रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:58 IST

अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत परवाना असलेल्या दुकानदारांनी कायद्याचे उल्लघन करून गुटखाजन्य पदार्थाची विक्री करतांना आढळून आल्यास, अशा दुकानाचा परवाना रद्द करण्याचे आदेश राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांनी दिले आहे. अशा प्रकारे गुटकाजन्य पदार्थाची विक्री करणा-यांचे दाबे दणाणले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत परवाना असलेल्या दुकानदारांनी कायद्याचे उल्लघन करून गुटखाजन्य पदार्थाची विक्री करतांना आढळून आल्यास, अशा दुकानाचा परवाना रद्द करण्याचे आदेश राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांनी दिले आहे. अशा प्रकारे गुटकाजन्य पदार्थाची विक्री करणा-यांचे दाबे दणाणले आहेत.जिल्ह्यातील २ हजार ८०० व्यापाºयांनी अन्न औषधी प्रशासन विभागाकडून परवाने काढले आहेत. त्या व्यतिरिक्त १३ हजार ५१५ छोट्या व्यावसायीकांनी नोंदणी केली आहे. गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास बंदी असतांनाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने गुटख्यासह सुंगधी तंबाखुची विक्री राजरोसपणे सुरूच आहे. विशेष म्हणजे पानटपरी धारकच नाही तर अन्न पदार्थ विक्री करणारे मोठे दुकानदारही गुटखा विक्री करीत असल्याचे निर्दशनात आले आहे. जिल्ह्यात अनेक छोटे दुकानदार टप-यामध्ये तंबाखूसोबतच चॉकलेट चिप्स, टॉफी, बिस्कीट, शितपेय आदींची विक्री करतात .अशा ठिकाणी लहान मुलेही चॉकलेट, चिप्स आदीचे सेवन करतात. अशा प्रकारे गुटखाजन्य पदार्थांची विक्री केल्यास लहान मुलावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच अन्न सुरक्षा कायदा २००६ चे कलम ३१ कलमाचे उल्लंघन सर्रासपणे होत आहे. ही बाब शासनाच्या निर्दशनात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता राज्य अन्न सुरक्षा विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी नुकतेच याबाबात आदेश काढून अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत प्राप्त अधिकारानुसार ज्या ठिकाणी अन्न पदार्थाची विक्रीच्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असेल, अशा दुकानदारांवर कडक कारवाई करावी. वेळ पडल्यास संबधीत दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचे आदेश नुकतेच जिल्हा अन्न सुरक्षा विभागाला दिले आहे. यामुळे ज्या दुकानदाराकडे अन्न सुरक्षा परवाने आहेत, अशा दुकानदारांची आता नियमित तपासणी होणार असून त्यानुसार कारवाई केली जाणार आहे.राज्यशासनाने गुटखा बंदी केल्यानंतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरूच आहे. मात्र याकडे कायम दुर्लक्ष होत असल्याने अल्पवयीन तरूण व्यसनाधीन होत आहेत. याकडे मात्र संबधीत विभागाचे कायम दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.