शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

जालन्यातील समृद्धीचे काम संपले; कंत्राटदारावरच्या २४२ कोटींच्या दंड वसुलीचे त्रांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2022 12:36 IST

मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम आता जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे.

जालना : जालना जिल्ह्यातील २५ गावांमधून समृद्धी महामार्ग जात आहे. या रस्त्याचे तेराशे कोटी रुपयांचे कंत्राट हे गुजरातमधील माँटेकार्लो कंपनीला मिळाले होते. या कंपनीने हे काम करताना अवैध मार्गाने माती, मुरूम आणि दगडाचे उत्खनन केल्याचा आरोप जालना आणि बदनापूर तहसीलदारांनी तपासणीअंती केला होता. त्यामुळे त्यांना २४२ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. जालन्यातील हे काम संपल्याने दंड वसुलीचे त्रांगडे निर्माण झाले आहे.

मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम आता जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. न्हावा ते गेवराई अशा जवळपास ४२ किलोमीटरचे काम माँटेकार्लो कंपनीस भेटले होते. चार वर्षांत या कंपनीने हे काम करत असताना आजूबाजूच्या डोंगरातून मोठ्या प्रमाणावर मुरूम, माती तसेच दगडांचे उत्खनन केले होते. याबाबत जालना आणि बदनापूर येथील तहसीलदारांनी ईटीस प्रणालीद्वारे तपासणी करून हा दंड कंपनीस आकारला होता.परंतु कंपनीने हा दंड मान्य नसल्याने त्यांनी थेट उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात याविरुद्ध अपिल केले होते. ते त्यांचे अपील या दोन्ही कोर्टाने फेटाळून संबंधित कंपनीने प्रथम ज्यांनी दंड आकारला त्यांच्याकडे तो कमी करून मिळावा म्हणून अर्ज करणे अपेक्षित होते; परंतु तसे कंपनीने न करता त्यांनी थेट वरिष्ठ न्यायालयात या दंड आकारणीस आव्हान दिले होते. याच प्रकरणात बदनापूरचे माजी आ. संतोष सांबरे यांनीही हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.

आता सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण निकाली काढूनही तीन महिने झाले आहेत. असे असताना कंपनीकडूनही दंड आकारणी चुकीची असल्याचा दावा कंपनीचे येथील वरिष्ठ अधिकारी अनिलकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही उत्खनन करण्यापूर्वी संबंधित विभागाला परवानगी मागितली होती; परंतु ती त्यांनी दिली नाही. विशेष म्हणजे आम्हाला काम करतानाच रॉयल्टी माफ असल्याचे अधिकार दिले होते. त्यानुसार आम्ही हे उत्खनन केल्याचे अनिलकुमार यांनी सांगितले. तसेच आम्ही आता महसूलमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर अर्ज करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गJalanaजालना