शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

जालन्यातील समृद्धीचे काम संपले; कंत्राटदारावरच्या २४२ कोटींच्या दंड वसुलीचे त्रांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2022 12:36 IST

मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम आता जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे.

जालना : जालना जिल्ह्यातील २५ गावांमधून समृद्धी महामार्ग जात आहे. या रस्त्याचे तेराशे कोटी रुपयांचे कंत्राट हे गुजरातमधील माँटेकार्लो कंपनीला मिळाले होते. या कंपनीने हे काम करताना अवैध मार्गाने माती, मुरूम आणि दगडाचे उत्खनन केल्याचा आरोप जालना आणि बदनापूर तहसीलदारांनी तपासणीअंती केला होता. त्यामुळे त्यांना २४२ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. जालन्यातील हे काम संपल्याने दंड वसुलीचे त्रांगडे निर्माण झाले आहे.

मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम आता जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. न्हावा ते गेवराई अशा जवळपास ४२ किलोमीटरचे काम माँटेकार्लो कंपनीस भेटले होते. चार वर्षांत या कंपनीने हे काम करत असताना आजूबाजूच्या डोंगरातून मोठ्या प्रमाणावर मुरूम, माती तसेच दगडांचे उत्खनन केले होते. याबाबत जालना आणि बदनापूर येथील तहसीलदारांनी ईटीस प्रणालीद्वारे तपासणी करून हा दंड कंपनीस आकारला होता.परंतु कंपनीने हा दंड मान्य नसल्याने त्यांनी थेट उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात याविरुद्ध अपिल केले होते. ते त्यांचे अपील या दोन्ही कोर्टाने फेटाळून संबंधित कंपनीने प्रथम ज्यांनी दंड आकारला त्यांच्याकडे तो कमी करून मिळावा म्हणून अर्ज करणे अपेक्षित होते; परंतु तसे कंपनीने न करता त्यांनी थेट वरिष्ठ न्यायालयात या दंड आकारणीस आव्हान दिले होते. याच प्रकरणात बदनापूरचे माजी आ. संतोष सांबरे यांनीही हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.

आता सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण निकाली काढूनही तीन महिने झाले आहेत. असे असताना कंपनीकडूनही दंड आकारणी चुकीची असल्याचा दावा कंपनीचे येथील वरिष्ठ अधिकारी अनिलकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही उत्खनन करण्यापूर्वी संबंधित विभागाला परवानगी मागितली होती; परंतु ती त्यांनी दिली नाही. विशेष म्हणजे आम्हाला काम करतानाच रॉयल्टी माफ असल्याचे अधिकार दिले होते. त्यानुसार आम्ही हे उत्खनन केल्याचे अनिलकुमार यांनी सांगितले. तसेच आम्ही आता महसूलमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर अर्ज करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गJalanaजालना