शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

टँकरची संख्या रोडावली

By admin | Updated: September 3, 2014 01:09 IST

जालना : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे टंचाईग्रस्त भागातील टँकरची संख्या रोडावली असून २६ आॅगस्ट रोजी ४६ असलेली संख्या २ सप्टेंबर रोजी १७ वर आली आहे.

जालना : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे टंचाईग्रस्त भागातील टँकरची संख्या रोडावली असून २६ आॅगस्ट रोजी ४६ असलेली संख्या २ सप्टेंबर रोजी १७ वर आली आहे. तर विहिरींच्या अधिग्रहणाची संख्याही १६१ वरून केवळ १६ वर आली आहे. आगामी काळात टँकरची संख्या फारशी वाढणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. यंदा जून, जुलै महिन्यात पावसाने निराशाच केली होती. आॅगस्टच्या मध्यंतरानंतर जिल्ह्यात भोकरदन, परतूर, जालना, बदनापूर, घनसावंगी या तालुक्यांत काही भागात चांगला पाऊस झाला. मात्र पोळा सणापासून आठवडाभरात जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पाणी आले. विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. २६ आॅगस्ट रोजी ४६, २७ रोजी ४५, २८ रोजी ४४, २९ रोजी ३८ तर ३१ आॅगस्ट रोजी ३१ टँकर सुरू होते. मुदत संपल्याने १ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात कुठेच टँकरद्वारे पाणीपुरवठा झाला नाही. मात्र जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी तातडीने टंचाईग्रस्त भागातील टँकर सुरू ठेवण्याचे आदेश दिले. याबाबतची माहिती शासनाला कळविण्यात येणार असून मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही सांगितले. दरम्यान, पावसामुळे जनतेला दिलासा मिळाला. (प्रतिनिधी) टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत दिली होती. मात्र ही मुदत संपल्यानंतरही काही भागात टंचाई कायम असल्याने जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी २ सप्टेंबर रोजी ज्या ठिकाणी टंचाई आहे, तेथील टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश दिले.४२६ आॅगस्ट रोजी १६६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले होते. २७ रोजी १६५, २८ रोजी १७०, २९ व ३० रोजी १६९, ३१ रोजी १६१ विहिरींचे अधिग्रहण होते. पावसामुळे ही संख्या १७ वर आली आहे.अंबड तालुक्यात ८ गावे आणि १० वाड्यांमध्ये १३ तर बदनापूर तालुक्यात ३ गावांमध्ये ३ असे एकूण १६ टँकर जिल्ह्यात सुरू आहेत. तर अंबड तालुक्यात १५ व बदनापूर तालुक्यात २ अशा एकूण १७ ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण कायम ठेवण्यात आले आहे. घनसावंगी तालुक्यात काही टँकर सुरू होण्याची शक्यत आहे. तर जालना तालुक्यातही एका टँकरची मागणी आहे.