शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणाच्या कामाची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:25 IST

वडीगोद्री : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून या प्रकल्पात संपादित केलेल्या जमीन व बांधकामाचा योग्य मोबदला न ...

वडीगोद्री : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून या प्रकल्पात संपादित केलेल्या जमीन व बांधकामाचा योग्य मोबदला न मिळाल्याने गुरुवारी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे हे पाहणी करण्यासाठी आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी विविध समस्या मांडल्या.यावेळी जोंधळे यांनी जालना जिल्हा हद्दीतील होत असलेल्या चौपदरीकरणाची पाहणी करून या महामार्गाचे काम करणा-या आयआरबी कंपनीच्या अधिका-यांना काम लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले. कुणाच्या संपादित झालेल्या शेत जमीन व बांधकाम बाबतच्या समस्या लवकर सोडवा अशा सूचनाही संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या. चुकीच्या निवाड्यामुळे या समस्या निर्माण झाल्याचे शेतक-यांनी जिल्हाधिका-यांना सांगितले.सा. बां. विभागाने संबंधित जमीन व इमारती संपादित करीत असताना प्रत्यक्ष जाऊन मोजमाप न केल्यामुळे चुकीच्या पद्धतीने मोजमाप झाल्याने शेतक-यांना मोबदला खूपच कमी मिळत असल्याची तक्रार आहे. जोंधळे यांनी या समस्या समजावून घेऊन एक महिन्याच्या आत मोबदला दिला जाईल, असे सांगितले.यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण धरमकर, महामार्ग प्रकल्प अधिकारी गाढेकर, तहसीलदार दत्ता भारस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने, आयआरबीचे अधिकारी धनराज परीट, एस. के. सावळकर, जनसंपर्क अधिकारी पाठक, २११ महामार्ग अन्याय कृती समितीचे तुकाराम वायाळ, बळीराम खटके, अजीम शेख, पंडित गावडे, विठ्ठल कोकणे, राजेंद्र तांदळे, आरेफ खान आदी उपस्थित होते.