शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

स्पार्किंगमुळे चार एकरातील ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडीगोद्री : वीजपुरवठा करणा-या उच्च दाबाच्या तारांमध्ये झलेल्या घर्षणामुळे तोडणीस आलेला चार एकरातील ऊस जळून खाक ...

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : वीजपुरवठा करणा-या उच्च दाबाच्या तारांमध्ये झलेल्या घर्षणामुळे तोडणीस आलेला चार एकरातील ऊस जळून खाक झाला. अंबड तालुक्यातील शिवाजीनगर येथे ही घटना घडली. विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे उसाला आग लागल्याची ही महिनाभरातील चौथी घटना असल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.शिवाजीनगर येथील तुकाराम तुळशीराम आदमाने, सखाराम तुळशीराम आदमाने व पांंडुरंग जालिंदर आदमाने यांनी गहिनीनाथनगर शिवारातील गट क्रमांक चारमध्ये उसाची लागवड केली आहे. शुक्रवारी सायंकाळी शेतावरून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडल्याने उसाला आग लागली. आग विझविण्यासाठी परिसरातील शेतक-यांनी शर्थीचे प्रयत्न केले. अन्यथा पाच हेक्टरपेक्षा जास्त ऊस जळून खाक झाला, असे तुकाराम आदमाने यांनी सांगितले. लोंबकळलेल्या तारांसंदर्भात अनेकदा तक्रार करूनही महावितरणच्या अधिका-यांनी दखल न घेतल्यामुळे चार लाखांचे नुकसान झाले असे आदमाने यांनी सांगितले. या प्रकरणी त्यांनी महावितरणच्या विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या महिन्यामध्ये विद्युत तारांमध्ये घर्षण ऊस जळाल्याच्या चार घटना घडल्या असून, शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.