शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

पट्ट्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST

अंबड : शहरातील शिवसेना शहर शाखेतर्फे स्व. मीनाताई ठाकरे यांची जयंती ममता दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रथम मीनाताई ...

अंबड : शहरातील शिवसेना शहर शाखेतर्फे स्व. मीनाताई ठाकरे यांची जयंती ममता दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रथम मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबासाहेब इंगळे, हनुमान धांडे, अशोक बरडे, कुमार रूपवते, सुरेश राजपूत आदींची उपस्थिती होती.

वसुंधरा अभियानांतर्गत जाफराबादेत रॅली

जाफराबाद : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत येथील नगरपंचायतीच्या वतीने शहरात रॅली काढण्यात आली. ही रॅली शहरातील मुख्य रस्ता, बाजार गल्ली, बसस्थानक परिसर, तहसील रोड यासह विविध गल्ल्यांमधून काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या घोषणा दिल्या. यावेळी विजया शिंगणे, प्रल्हाद माने, भरत पाटील, धिरज गोफणे आदींची उपस्थिती होती.

प्रकल्प अधिकाऱ्यांची अंगणवाडीला भेट

घनसावंगी : तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील साठेनगर भागातील अंगणवाडी क्रमांक चारमध्ये बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचे वाटप होत नाही, अशा तक्रारी येताच एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी बैलास बडे, पर्यवेक्षिका रत्नप्रभा कुलकर्णी यांनी बुधवारी अंग‌णवाडीला भेट दिली. यावेळी त्यांनी आहाराच्या साहित्याच्या पंचनामा केला.

इंटरनेट विस्कळीत

जालना : मागील काही दिवसांपासून शहरातील बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली आहे. वारंवार इंटरनेट बंद पडत आहे. त्यामुळे इंटरनेटची गती कमी झालेली आहे. याचा ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, ही नित्याचीच बाब असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रचाराला वेग

जालना : तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या गावोगाव प्रचाराला वेग आला आहे. उमेदवार विविध प्रलोभने दाखवून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शिवाय मतदारांची जेवणाची रलचेलही सुरू आहे.

आसरखेडा- बावणे पांगरी रस्त्याची दुरवस्था

बदनापूर : तालुक्यातील आसरखेडा ते बावणे पांगरी या सहा किलोमीटर रस्त्याची मागील काही दिवसांपासून मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रात्री- अपरात्री किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वेळीच रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी होत आहे.

९ जागांसाठी २६ उमेदवार

जालना : तालुक्यातील जामवाडी येथील ग्रामपंचायतच्या नऊ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, ४१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये एक अर्ज अवैध ठरला. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १४ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता २६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात आठ उमेदवार अपक्ष असून, प्रत्येकाने गावात प्रचाराला सुरुवात केली आहे.