शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पट्ट्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST

अंबड : शहरातील शिवसेना शहर शाखेतर्फे स्व. मीनाताई ठाकरे यांची जयंती ममता दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रथम मीनाताई ...

अंबड : शहरातील शिवसेना शहर शाखेतर्फे स्व. मीनाताई ठाकरे यांची जयंती ममता दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रथम मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबासाहेब इंगळे, हनुमान धांडे, अशोक बरडे, कुमार रूपवते, सुरेश राजपूत आदींची उपस्थिती होती.

वसुंधरा अभियानांतर्गत जाफराबादेत रॅली

जाफराबाद : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत येथील नगरपंचायतीच्या वतीने शहरात रॅली काढण्यात आली. ही रॅली शहरातील मुख्य रस्ता, बाजार गल्ली, बसस्थानक परिसर, तहसील रोड यासह विविध गल्ल्यांमधून काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या घोषणा दिल्या. यावेळी विजया शिंगणे, प्रल्हाद माने, भरत पाटील, धिरज गोफणे आदींची उपस्थिती होती.

प्रकल्प अधिकाऱ्यांची अंगणवाडीला भेट

घनसावंगी : तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील साठेनगर भागातील अंगणवाडी क्रमांक चारमध्ये बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचे वाटप होत नाही, अशा तक्रारी येताच एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी बैलास बडे, पर्यवेक्षिका रत्नप्रभा कुलकर्णी यांनी बुधवारी अंग‌णवाडीला भेट दिली. यावेळी त्यांनी आहाराच्या साहित्याच्या पंचनामा केला.

इंटरनेट विस्कळीत

जालना : मागील काही दिवसांपासून शहरातील बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली आहे. वारंवार इंटरनेट बंद पडत आहे. त्यामुळे इंटरनेटची गती कमी झालेली आहे. याचा ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, ही नित्याचीच बाब असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रचाराला वेग

जालना : तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या गावोगाव प्रचाराला वेग आला आहे. उमेदवार विविध प्रलोभने दाखवून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शिवाय मतदारांची जेवणाची रलचेलही सुरू आहे.

आसरखेडा- बावणे पांगरी रस्त्याची दुरवस्था

बदनापूर : तालुक्यातील आसरखेडा ते बावणे पांगरी या सहा किलोमीटर रस्त्याची मागील काही दिवसांपासून मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रात्री- अपरात्री किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वेळीच रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी होत आहे.

९ जागांसाठी २६ उमेदवार

जालना : तालुक्यातील जामवाडी येथील ग्रामपंचायतच्या नऊ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, ४१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये एक अर्ज अवैध ठरला. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १४ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता २६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात आठ उमेदवार अपक्ष असून, प्रत्येकाने गावात प्रचाराला सुरुवात केली आहे.