शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

प्रेम, त्याग आणि सदाचाराची शिकवन भागवत कथेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST

देळेगव्हाण : श्रीमद् भागवत कथा ही अद्भूत असून, ही कथा श्रीकृष्णाची शब्दमूर्ती आहे. ही पवित्र भागवत कथा श्रवण करण्याची ...

देळेगव्हाण : श्रीमद् भागवत कथा ही अद्भूत असून, ही कथा श्रीकृष्णाची शब्दमूर्ती आहे. ही पवित्र भागवत कथा श्रवण करण्याची केवळ इच्छा होणे हे परमभाग्य आहे. ही कथा प्रेम त्याग आणि सदाचाराची शिकवण देते, त्यामुळे या कथेचे सातत्याने श्रवण करून आत्मचिंतन करतांनाच तशी कृती प्रत्येकाने आपल्या जीवनात करणे गरजेचे असून, भागवत ग्रंथ हे जीवन जगण्याचे मूलतंत्र असल्याचे मत भागवताचार्य हभप. विष्णू देशमुख यांनी केले.

देळेगव्हाण येथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाची रूपरेषा बदलून अगदी छोट्या खाणी कार्यक्रम घेण्यात येत आहे. यात भागवताचार्य हभप. विष्णू देशमुख कनक सागज आश्रम वैजापूरकर यांच्या वाणीतून रात्री ८ ते १० दरम्यान भागवत कथेचे आयोजन करण्यात येत आहे. भागवत कथेतून सदाचारी जीवनाची शिकवण मिळते. सदाचारी बनायचे असेल तर भगवंताच्या भक्ताची संगत करा, त्यातून जीवनात आमूलाग्र बदल होईल, जशी संगत तशी माणसाची घडण होत असते. त्यामुळे नेहमी संगत साधू संतांची करा, असा संदेश त्यांनी दिला.

चौकट

श्रीकृष्ण यांच्या भक्ताचे चरित्र वाचून ते आत्मसात करा, असे आवाहनही त्यांनी या वेळेस केले. संत हे राष्ट्राची अमूल्य संपत्ती आहे. केवळ माणसातील अंहकारामुळे आपण संतांना ओळखू शकत नाही. या भागवत कथेत संपूर्ण जीवनाचे सार आहे. म्हणून ही कथा श्रावण करून आत्मसात करा, असा संदेशही देशमुख महाराजांनी दिला.