शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

परतूर, मंठा तालुक्यांतील विकासकामांना गती द्या- बबनराव लोणीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 01:02 IST

परतूर व मंठा या तालुक्यांत करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा आढावा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी मॅरेथॉन बैठक घेत सर्व संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून घेऊन या भागात करण्यात येत असलेल्या विकासकामांना गती देण्याचे निर्देश दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतूर व मंठा या तालुक्यांत करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा आढावा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी मॅरेथॉन बैठक घेत सर्व संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून घेऊन या भागात करण्यात येत असलेल्या विकासकामांना गती देण्याचे निर्देश दिले.यावेळी जि. प. चे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोकणी, परतूरचे तहसीलदार भाऊसाहेब कदम, मंठ्याच्या तहसीलदार सुमन मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एम.के. राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. राज्यातील बुलडाणा, अमरावती व अकोला या भागांत पाण्याचे नमुने तपासणीमध्ये दूषित आढळून आल्याने बुलडाणा येथे १३५ गावांसाठी वॉटरग्रीड योजना राबविण्याबरोबरच शुद्ध पाण्यासाठी आरओ मशिन्स बसविण्यात आल्या आहेत. जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा तसेच नेर-सेवली या भागातील ८१ गावांमध्ये २५ कोटी रुपये खर्चून आर.ओ. मशिन्स बसविण्यात येणार आहेत. या आर.ओ. मशिन्सची गावामध्ये उभारणी करताना गावाच्या मध्यभागी तसेच पाण्याचा स्त्रोत असलेल्या ठिकाणी उभारणी करण्यात यावी. जेणेकरुन या मशिन्सचा फायदा संपूर्ण गावासाठी होईल. असे लोणीकर यांनी सांगितले. समाजातील दिव्यांगांच्या उन्नतीसाठी शासन अनेकविध योजना राबविते. या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक दिव्यांगांना एकाच छताखाली मिळण्यासाठी महाशिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश देत समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाºया योजना, एस.टी. महामंडळामार्फत देण्यात येणारे लाभ तसेच कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांचा लाभ दिव्यांगांना देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे . दिव्यांगांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेवून अधिकाधिक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच शासनाच्या योजनांपासून एकही दिव्यांग वंचित राहणार नाही यासाठी सर्व संबंधित विभागाच्या अधिका-यांनी दक्षता घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.३०५ गावांची निवडजागतिक बँकेच्या अर्थ सहाय्याने राबविण्यात येणा-या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात राज्यातील १५ जिल्ह्यातील ५ हजार १४२ गावांची तर जालना जिल्ह्यातील ३०५ गावांची निवड करण्यात आली असून या गावांमध्ये फळबाग लागवड, संरक्षित शेती, एकात्मिक शेती पद्धती, सूक्ष्म सिंचन, सामूहिक लाभ, मृद व जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत. शेतक-यांना शाश्वत शेतपिकाच्या उत्पादनासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी हा प्रकल्प अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Babanrao Looneykarबबनराव लोणीकरgovernment schemeसरकारी योजना