शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

रब्बीतील पिकांची पेरणी दीड पटीने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:25 IST

बदनापूर : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामावर अधिक भर दिला ...

बदनापूर : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामावर अधिक भर दिला आहे. तालुक्याचे रब्बी पिकांचे क्षेत्र सरासरी १४६९२ हेक्टरवर आहे. यंदा मात्र, तब्बल २४७३५.५ हेक्टरवर पेरा झाला असून, दीड ते पावणेदोन पटीने हा पेरा वाढला आहे.

बदनापूर तालुक्यात पाच महसूल मंडळ असून, यापैकी बदनापूर महसूल मंडळात एकूण १६ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण ९७५७ हे भौगोलिक क्षेत्र आहे. ७३५१.२ हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. या क्षेत्रापैकी २४४८ हे क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य पिके व ५६२ हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली आहे. रोषणगाव महसूल मंडळात एकूण १६ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण १४५६२.८ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून, १२९८८.५ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ४९५१ हेक्टर क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य व गळीत धान्य पिके व १४८४ हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली आहे. दाभाडी महसूल मंडळात एकूण २० गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण १४५२८.५ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून, ११८१६.७ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ४९३० हेक्टर क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य व गळीत धान्य पिके व १००२ हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली आहे.

शेलगाव महसूल मंडळात एकूण २० गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण १६३२६.१२ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून, १२९३०.७ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ६१७० हेक्टर क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य व गळीत धान्य पिके व २०२३ हेक्टरवर कडधान्यांची पेरणी केली आहे. बावणे पांगरी महसूल मंडळात एकूण १६ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण २१३४२.२ हे भौगोलिक क्षेत्र असून, १६८१२.३ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ६२१६.५ हेक्टर क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य व गळीत धान्य पिके व ११८० हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली आहे.

गहू, हरभरा, मक्याचा पेरा अधिक

तालुक्यात रब्बी ज्वारी, मका, गहू, हरभरा अशी रब्बी पिके व जवस, करडईसह इतर तेलबियांची पेरणी करण्यात आली आहे. तालुक्यात सध्या विहिरींच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे गहू, हरभरा, मक्याचा पेरा सरासरीपेक्षा अडीच पटीने वाढला आहे. अनेक वर्षांनंतर यंदा तालुक्यात प्रथमच रब्बी पिकांचा पेरा कमालीचा वाढला आहे. तालुक्यातील पीरवाडी, धनगरवाडी व राजेवाडी या गावांमधील रब्बी पिकांचा पेरा मात्र शून्य दिसत आहे.