शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीतील पिकांची पेरणी दीड पटीने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:25 IST

बदनापूर : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामावर अधिक भर दिला ...

बदनापूर : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामावर अधिक भर दिला आहे. तालुक्याचे रब्बी पिकांचे क्षेत्र सरासरी १४६९२ हेक्टरवर आहे. यंदा मात्र, तब्बल २४७३५.५ हेक्टरवर पेरा झाला असून, दीड ते पावणेदोन पटीने हा पेरा वाढला आहे.

बदनापूर तालुक्यात पाच महसूल मंडळ असून, यापैकी बदनापूर महसूल मंडळात एकूण १६ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण ९७५७ हे भौगोलिक क्षेत्र आहे. ७३५१.२ हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. या क्षेत्रापैकी २४४८ हे क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य पिके व ५६२ हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली आहे. रोषणगाव महसूल मंडळात एकूण १६ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण १४५६२.८ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून, १२९८८.५ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ४९५१ हेक्टर क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य व गळीत धान्य पिके व १४८४ हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली आहे. दाभाडी महसूल मंडळात एकूण २० गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण १४५२८.५ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून, ११८१६.७ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ४९३० हेक्टर क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य व गळीत धान्य पिके व १००२ हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली आहे.

शेलगाव महसूल मंडळात एकूण २० गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण १६३२६.१२ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून, १२९३०.७ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ६१७० हेक्टर क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य व गळीत धान्य पिके व २०२३ हेक्टरवर कडधान्यांची पेरणी केली आहे. बावणे पांगरी महसूल मंडळात एकूण १६ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये एकूण २१३४२.२ हे भौगोलिक क्षेत्र असून, १६८१२.३ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ६२१६.५ हेक्टर क्षेत्रात रब्बीतील अन्नधान्य व गळीत धान्य पिके व ११८० हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली आहे.

गहू, हरभरा, मक्याचा पेरा अधिक

तालुक्यात रब्बी ज्वारी, मका, गहू, हरभरा अशी रब्बी पिके व जवस, करडईसह इतर तेलबियांची पेरणी करण्यात आली आहे. तालुक्यात सध्या विहिरींच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे गहू, हरभरा, मक्याचा पेरा सरासरीपेक्षा अडीच पटीने वाढला आहे. अनेक वर्षांनंतर यंदा तालुक्यात प्रथमच रब्बी पिकांचा पेरा कमालीचा वाढला आहे. तालुक्यातील पीरवाडी, धनगरवाडी व राजेवाडी या गावांमधील रब्बी पिकांचा पेरा मात्र शून्य दिसत आहे.