शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

कधी पैशांसाठी पाऊस, तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती; अंधश्रद्धेचे भूत कधी उतरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:31 IST

जालना : धनलाभ करून देणे, पुत्रप्राप्तीसह इतर विविध आमिषे दाखवून नागरिकांना अंधश्रद्धेच्या आहारी घेत हातचलाखीच्या माध्यमातून करणी-भानामती करणाऱ्या भोंदू ...

जालना : धनलाभ करून देणे, पुत्रप्राप्तीसह इतर विविध आमिषे दाखवून नागरिकांना अंधश्रद्धेच्या आहारी घेत हातचलाखीच्या माध्यमातून करणी-भानामती करणाऱ्या भोंदू बाबांची चलती आहे.

नागरिकांच्या अज्ञानाचा लाभ घेत मानसिक, आर्थिक लूट केली जाते. अशा भोंदू बाबांच्या कृत्याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून जिल्हाभरात जनजागृती केली जात आहे. नागरिकांनीही या अंधश्रद्धेच्या नावाखाली भोंदूंच्या हातचलाखीला बळी न पडणे गरजेचे आहे.

२०१३ मध्ये झाला कायदा

जादूटोणा, करणी, भानामती आदी प्रकारांना आळा घालण्यासाठी २०१३ मध्ये महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ लागू करण्यात आला आहे. या कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासन, प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहेत.

भानामती कसली,

हे तर खेळ विज्ञानाचे

म्हणे, पैशांचा पाऊस पाडतो..

पैशांचा पाऊस पाडतो म्हणून अनेकांना लुटले जाते. जालना जिल्ह्यातील एका व्यक्तीला अशा प्रकरणात अटकही झाली आहे.

अनेकांकडून अघोरी कृत्य

धन मिळविणे, भूत-पिशाच्चांना घालविण्याचे आश्वासन देत अनेकजण अघोरी कृत्य करतात. यातील अनेक कृत्ये ही विज्ञानाचा आधार घेत हातचलाखीने केली जातात.

कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी

जादूटोणा विरोधी कायदा संमत करण्यासाठी पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना १८ वर्षे संघर्ष करावा लागला. त्यांचा खून झाल्यानंतर कायदा संमत झाला. शासनाने या कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

-ज्ञानेश्वर गिराम, जिल्हा कार्याध्यक्ष

अलौकिक शक्ती प्राप्त असल्याचा दावा करून संतान प्राप्तीसाठी महिलांचे शोषण केल्याचे प्रकार समोर आले.

होमहवन करून अमानुष कृत्येही करण्यास सांगितली जातात. यापासून नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.