शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीत खदखद ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:47 IST

वर्षभरापूर्वी जालना नगरपालिकेत सत्ता मिळविलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये कमालीची खदखद पसरलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वर्षभरापूर्वी जालना नगरपालिकेत सत्ता मिळविलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये कमालीची खदखद पसरलेली आहे. ठराविक नगरसेवकांना कोट्यवधींची कामे दिली जात असून, इतरांना दडपशाहीने जेरीस आणण्याचा डाव खेळला जात आहे. गटातटाच्या राजकारणाला कंटाळून काही नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून, त्यांचा लवकरच पक्षप्रवेशही होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.वर्षभरापूर्वी जालना नगर पालिकेच्या ६१ वॉर्ड आणि नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने निकालानंतर पालिकेत आघाडीची सत्ता आली.त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शहरातील विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे. या निधीतून केवळ भाजप नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामे केली जात आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील ठराविक नगरसेवकांना विकास कामे दिली जात असल्याने सत्तेत असून ‘उपाशी’ राहण्याची वेळ आघाडीच्या नगरसेवकांवर आली आहे. तर काँग्रेसच्या ‘बाहुबली’ नगरसेवकांना कामे दिली जात असल्याने प्रामाणिकपणे काम करणा-या नगरसेवकांमध्ये खदखद आहे.यातील काही नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून, खा. रावसाहेब दानवे यांनीही आघाडीच्या नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आगामी काही महिन्यांत जालना न.प.ची महापालिका करण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न असून, याच पार्श्वभूमीवर भाजपने शहर व परिसरात ताकद वाढविण्याच्या दृष्टीने राजकीय आयुधे वापरण्यास सुरुवात केली आहे. आघाडीच्या नगरसेवकांना आपल्या तंबूत आणून पालिकेवर सत्ता मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दोन वॉर्डांचा एक प्रभाग असल्याने विकासकामे करताना ‘दादा’ नगरसेवकांनी स्वत:च कामे घेण्यास सुरुवात केली असून, संपूर्ण प्रभागात आपल्यालाच कामे मिळावीत, अशी या नगरसेवकांची भूमिका असल्याने इतर नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी आहे.गटातटाच्या राजकारणामुळे प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करणा-यांमध्ये असंतोष पसरला आहे. आता ही कोंडी या पक्षांचे नेते कसे फोडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.जायचे तर खुशाल जाकाँग्रेस पक्ष सोडण्याची भाषा करणारे केवळ याच पक्षामुळे निवडून आले आहेत. याचा विसर या नगरसेवकांना पडला आहे. शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर अशांचा दोन्ही वेळा पराभव झाला. ज्याला सोडचिठ्ठी द्यायची असेल, त्यांनी द्यावी. पक्ष कुणाला रोखणार नाही.- कैलास गोरंट्याल, माजी आमदार, जालना