शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

आघाडीत खदखद ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:47 IST

वर्षभरापूर्वी जालना नगरपालिकेत सत्ता मिळविलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये कमालीची खदखद पसरलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वर्षभरापूर्वी जालना नगरपालिकेत सत्ता मिळविलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये कमालीची खदखद पसरलेली आहे. ठराविक नगरसेवकांना कोट्यवधींची कामे दिली जात असून, इतरांना दडपशाहीने जेरीस आणण्याचा डाव खेळला जात आहे. गटातटाच्या राजकारणाला कंटाळून काही नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून, त्यांचा लवकरच पक्षप्रवेशही होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.वर्षभरापूर्वी जालना नगर पालिकेच्या ६१ वॉर्ड आणि नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने निकालानंतर पालिकेत आघाडीची सत्ता आली.त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शहरातील विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे. या निधीतून केवळ भाजप नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामे केली जात आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील ठराविक नगरसेवकांना विकास कामे दिली जात असल्याने सत्तेत असून ‘उपाशी’ राहण्याची वेळ आघाडीच्या नगरसेवकांवर आली आहे. तर काँग्रेसच्या ‘बाहुबली’ नगरसेवकांना कामे दिली जात असल्याने प्रामाणिकपणे काम करणा-या नगरसेवकांमध्ये खदखद आहे.यातील काही नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून, खा. रावसाहेब दानवे यांनीही आघाडीच्या नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आगामी काही महिन्यांत जालना न.प.ची महापालिका करण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न असून, याच पार्श्वभूमीवर भाजपने शहर व परिसरात ताकद वाढविण्याच्या दृष्टीने राजकीय आयुधे वापरण्यास सुरुवात केली आहे. आघाडीच्या नगरसेवकांना आपल्या तंबूत आणून पालिकेवर सत्ता मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दोन वॉर्डांचा एक प्रभाग असल्याने विकासकामे करताना ‘दादा’ नगरसेवकांनी स्वत:च कामे घेण्यास सुरुवात केली असून, संपूर्ण प्रभागात आपल्यालाच कामे मिळावीत, अशी या नगरसेवकांची भूमिका असल्याने इतर नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी आहे.गटातटाच्या राजकारणामुळे प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करणा-यांमध्ये असंतोष पसरला आहे. आता ही कोंडी या पक्षांचे नेते कसे फोडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.जायचे तर खुशाल जाकाँग्रेस पक्ष सोडण्याची भाषा करणारे केवळ याच पक्षामुळे निवडून आले आहेत. याचा विसर या नगरसेवकांना पडला आहे. शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर अशांचा दोन्ही वेळा पराभव झाला. ज्याला सोडचिठ्ठी द्यायची असेल, त्यांनी द्यावी. पक्ष कुणाला रोखणार नाही.- कैलास गोरंट्याल, माजी आमदार, जालना