शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

सौरऊर्जा निर्मितीचा पायलट प्रकल्प राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:08 IST

जालना जिल्ह्यात सौरऊर्जा निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक जमिनीचे सर्वेक्षण आठवडाभरात पूर्ण करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी संबंधित अधिका-यांना दिले.

जालना : जालना जिल्ह्यात सौरऊर्जा निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक जमिनीचे सर्वेक्षण आठवडाभरात पूर्ण करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी संबंधित अधिका-यांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी आयोजित मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. येणा-या काळात पुरेशा प्रमाणात वीज पुरवठ्यासाठी संपूर्ण राज्यात सौरउर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सौजऊर्जेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राची उभारणी करण्यासाठी २० एकर आणि १३२ के.व्ही. उपकेंद्राच्या उभारणीसाठी १०० एकर जागेची आवश्यकता असते. जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शासकीय गायरान जमीन उपलब्ध आहे. या जमिनीचा उपयोग सौरउर्जा प्रकल्प उभारणीसाठी केला जाईल. तसेच ज्या ठिकाणी शासकीय जमीन उपलब्ध नाही तिथे शेतक-यांची किंवा इच्छुक संस्थाची जमीन भाडेतत्त्वावर घेतली जाईल.बैठकीस जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, जालन्याचे उपविभागीय अधिकारी केशव नेटके, भोकरदनचे हरिश्चंद्र गवळी, अंबडचे प्रवीण धरमकर, तहसीलदार विपीन पाटील, अधीक्षक अभियंता कैलास हुमने यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.-------------निधी वेळेत खर्च कराजिल्हा वार्षिक योजनेच्या पुनर्विनियोजनाचा आढावाही लोणीकरांनी घेतला. जिल्ह्याच्या विकासासाठी वार्षिक योजनेच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. मराठवाड्याच्या विकासाच्या नियोजनाची बैठक वित्तमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याला अधिकाधिक निधी प्राप्त होण्यासाठी सर्व विभागांनी विकास कामांवर आधारित उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण करावे. तसेच चालू वर्षात यंत्रणांना देण्यात आलेला निधी पूर्णपणे खर्च होईल याची दक्षता घेण्याचे निर्देशही लोणीकर यांनी दिले.------------------