शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

नागपंचमीला सापाला पुजले जाते,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST

सर्पमित्रांकडून जनजागृती : जिल्ह्यामध्ये बिनविषारी साप अधिक जालना : सापाबद्दल असलेल्या गैरसमजामुळे साप दिसला की, त्याला मारण्यास धावणाऱ्यांची संख्या ...

सर्पमित्रांकडून जनजागृती : जिल्ह्यामध्ये बिनविषारी साप अधिक

जालना : सापाबद्दल असलेल्या गैरसमजामुळे साप दिसला की, त्याला मारण्यास धावणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्याच सापाला नागपंचमीदिवशी पुजले जाते. परंतु, जालना जिल्ह्यात विषारीऐवजी बिनविषारी साप अधिक आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्यातील सर्पमित्रही जनजागृती मोहीम राबवित आहेत.

नागपंचमी हा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी सापाची पूजाही केली जाते. एरव्ही, साप दिसल्यानंतर अनेकांची भांबेरी उडते. अनेकजण त्याला मारायला धावतात. परंतु, जिल्ह्यातील सर्पमित्रांनी केलेल्या जनजागृतीमुळे आज सापाला मारणाऱ्यांची संख्या कमी हाेत आहे. शिवाय, या सापांनाही जीवदान मिळू लागले आहे.

जिल्ह्यात आढळणारे सापांचे प्रकार

विषारी : कोब्रा, घोणस, मण्यार, फुरसे हे विषारी साप जिल्ह्यात आढळून येतात. यात घोणस या प्रजातीचे सर्प जिल्ह्यात अधिक प्रमाणात आढळून येतात.

बिनविषारी : धामण, गवत्या, ट्रिंकेट, मांडूळ, कुकरी, वाळा, मांजऱ्या, शेलाटी, कवड्या हे बिनविषारी साप जिल्ह्यामध्ये आढळून येतात.

साप आढळला तर...

जिल्ह्यात आढळणारे सर्व साप विषारी नाहीत. साप स्वत:हून हल्ला करीत नाही.

सापावर पाय पडला किंवा आपण त्याच्या जवळ गेलो तर साप दंश करतो.

त्यामुळे साप दिसल्यानंतर त्याला मारू नये. त्याच्यावर नजर ठेवून आपल्या परिसरात असलेल्या सर्पमित्रांशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत तो साप वनक्षेत्रात सोडून द्यावा.

साप हा तर शेतकऱ्याचा मित्र

शेतातील पिकांची, धान्याची उंदीर नासाडी करतात. या उंदरांना साप खातात. तर, मांडुळासह इतर काही साप हे जमीन सुपीक करण्यासाठी मोठी मदत करतात. त्यामुळे या सर्पांना शेतकऱ्यांचे मित्र म्हणतात. अनेक शेतकरी साप आढळला तर शेतकरी मित्रांना बोलावितात.

सर्पमित्र काय म्हणतात...

मी सर्पमित्र म्हणून आठ ते दहा वर्षांपासून काम करीत आहे. आजवर जवळपास दीड हजारांवर सापांना जीवदान दिले आहे. साप स्वत:हून हल्ला करीत नाही. त्यामुळे त्याला न मारता सर्पमित्रांशी संपर्क करावा. - विजय आगळे, सर्पमित्र