शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

साहेब काहीही करा...साखर कारखाना सुरू करा : जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST

राज्य सहकारी बँकेचे या कारखान्यावर केवळ ११ कोटी रुपयांचे कर्ज होते आणि त्याचे व्याज मिळून ते २८ कोटी रुपयांवर ...

राज्य सहकारी बँकेचे या कारखान्यावर केवळ ११ कोटी रुपयांचे कर्ज होते आणि त्याचे व्याज मिळून ते २८ कोटी रुपयांवर पोहोचले होते. त्याामुळे हे कारण देत हा कारखाना साधारपणे २०१३ मध्ये विक्री करण्यात आला.

औरंगाबाद येथील एका बड्या उद्योजकाने या कारखान्याची खरेदी केली तेव्हा हा कारखाना सुरू होईल अशी आशा होती. परंतु आता आठ वर्षांनंतर कारखाना सुरू करण्याबाबत कुठल्याच हालचाली न झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. अत्यंत कमी कर्ज असताना या कारखान्याची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. सध्या येथील कारखाना परिसरात असलेला कारखान्याचा आत्मा म्हणेच बॉयलर तोडण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. परंतु कोणालाही कारखान्यात जाऊ दिले जात नसल्याने याबद्दल सविस्तर माहिती मिळत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. या शिष्टमंडळाचे म्हणजे जिल्हाधिकारी राठोड यांनी काळजीपूर्वक ऐकून या बाबत मला पाहिजे ती माहिती मागवून त्यावर अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेऊन नंतर योग्य तो निर्णय आपण देऊ, असे सांगितले. या सर्व प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणीदेखील शिष्टमंडळाने केल्याचे सांगण्यात आले. या कारखान्यांचे बदनापूर आणि जालना तालुक्यातील मिळून जवळपास साडेसात हजार सभासद असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे.

या शिष्टमंडळात परशुराम मोहिते, आर.आर. खडके, ज्ञानेश्वर भांदरगे, सोपानराव भांदरगे, डी. के. मोरे, रावसाहेब पवार, ज्ञानेश्वर तौर, ज्ञानेश्वर कदम, ज्ञानेश्वर डुकरे, सुभाष कोळकर, अंकुकशराव राऊत, अंकुशराव देशमुख, लक्ष्णण शिंदे, लक्ष्मण घाेडके यांच्या अन्य पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.

चौकट

हातवन प्रकल्पामुळे आशा उंचावल्या

जालना तालुक्यातील हातवन येथे जवळपास एक हजार कोटी रुपये खर्च करून मोठा साठवण तलाव दुधना नदीवर होणार आहे. त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. हा तलाव झाल्यास या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून ऊस लागवड वाढू शकते. त्या काळात कुठलीही सिंचन व्यवस्था नसतांना कारखाना क्षेत्रात शेतकऱ्यांनी उस लावला होता.

चौकट

जिल्ह्यात अतिरिक्त ऊस

आज जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे अंबड आणि घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली आहे. या भागातील समर्थ, सागर तसेच परतूर तालुक्यातील बागेश्वरी, समृध्दी साखर कारखान्याने मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप करूनही ऊस शिल्लक आहे. जर जालना सहकारी कारखाना सुरू असता, तर त्यांना ऊसाची कमी सध्या तरी जाणवली नसती असे सांगण्यात आले.