शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

साहेब काहीही करा...साखर कारखाना सुरू करा : जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST

राज्य सहकारी बँकेचे या कारखान्यावर केवळ ११ कोटी रुपयांचे कर्ज होते आणि त्याचे व्याज मिळून ते २८ कोटी रुपयांवर ...

राज्य सहकारी बँकेचे या कारखान्यावर केवळ ११ कोटी रुपयांचे कर्ज होते आणि त्याचे व्याज मिळून ते २८ कोटी रुपयांवर पोहोचले होते. त्याामुळे हे कारण देत हा कारखाना साधारपणे २०१३ मध्ये विक्री करण्यात आला.

औरंगाबाद येथील एका बड्या उद्योजकाने या कारखान्याची खरेदी केली तेव्हा हा कारखाना सुरू होईल अशी आशा होती. परंतु आता आठ वर्षांनंतर कारखाना सुरू करण्याबाबत कुठल्याच हालचाली न झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. अत्यंत कमी कर्ज असताना या कारखान्याची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. सध्या येथील कारखाना परिसरात असलेला कारखान्याचा आत्मा म्हणेच बॉयलर तोडण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. परंतु कोणालाही कारखान्यात जाऊ दिले जात नसल्याने याबद्दल सविस्तर माहिती मिळत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. या शिष्टमंडळाचे म्हणजे जिल्हाधिकारी राठोड यांनी काळजीपूर्वक ऐकून या बाबत मला पाहिजे ती माहिती मागवून त्यावर अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेऊन नंतर योग्य तो निर्णय आपण देऊ, असे सांगितले. या सर्व प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणीदेखील शिष्टमंडळाने केल्याचे सांगण्यात आले. या कारखान्यांचे बदनापूर आणि जालना तालुक्यातील मिळून जवळपास साडेसात हजार सभासद असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे.

या शिष्टमंडळात परशुराम मोहिते, आर.आर. खडके, ज्ञानेश्वर भांदरगे, सोपानराव भांदरगे, डी. के. मोरे, रावसाहेब पवार, ज्ञानेश्वर तौर, ज्ञानेश्वर कदम, ज्ञानेश्वर डुकरे, सुभाष कोळकर, अंकुकशराव राऊत, अंकुशराव देशमुख, लक्ष्णण शिंदे, लक्ष्मण घाेडके यांच्या अन्य पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.

चौकट

हातवन प्रकल्पामुळे आशा उंचावल्या

जालना तालुक्यातील हातवन येथे जवळपास एक हजार कोटी रुपये खर्च करून मोठा साठवण तलाव दुधना नदीवर होणार आहे. त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. हा तलाव झाल्यास या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून ऊस लागवड वाढू शकते. त्या काळात कुठलीही सिंचन व्यवस्था नसतांना कारखाना क्षेत्रात शेतकऱ्यांनी उस लावला होता.

चौकट

जिल्ह्यात अतिरिक्त ऊस

आज जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे अंबड आणि घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली आहे. या भागातील समर्थ, सागर तसेच परतूर तालुक्यातील बागेश्वरी, समृध्दी साखर कारखान्याने मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप करूनही ऊस शिल्लक आहे. जर जालना सहकारी कारखाना सुरू असता, तर त्यांना ऊसाची कमी सध्या तरी जाणवली नसती असे सांगण्यात आले.